कोल्हापूर : पंढरीची वारी वर्षातून एकदा असते. नमाज पठण दिवसातून चार वेळा केले जाते. त्रास होणार नसलेल्या ठिकाणी नमाज पठण करावे, अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार अबू आझमी यांना सोमवारी सुनावले.

संतांच्या पालखीमुळे वाहतूक कोंडी होत नाही का, असा प्रश्न समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी उपस्थित केला होता. त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत आज येथे पत्रकारांनी विचारणा केली असता मंत्री मुश्रीफ बोलत होते. वारीत लाखो लोक जात असतात. त्यासाठी पालखी मार्ग शासनाने केला आहे. ते भेटल्यावर त्यांना वारकरी आणि वारी समजवून सांगेन, असेही मुश्रीफ म्हणाले.