मोटेराच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडून १० गडी राखून पराभव पत्करल्याने इंग्लंडचा संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-२ असा पिछाडीवर पडला आहे. त्यानंतर दोन दिवसांत सामना संपवण्याची किमया साधणाऱ्या खेळपट्टीवर वॉनने ताशेरे ओढले. ‘‘भारतासारख्या सामर्थ्यवान राष्ट्राबाबत ‘आयसीसी’ मौन बाळगते. त्यामुळे कसोटी क्रिकेटचे मोठे नुकसान होते आहे. महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर खेळपट्टीवर टीका करण्याऐवजी यशाचे श्रेय भारताच्या फिरकी गोलंदाजांना देतात, हे खेदजनक आहे,’’ असे वॉनने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामने कमी दिवसांत संपणार असतील, तर प्रक्षेपणकर्ते कराररकमेतून परतावा मागतील, असा इशारा २००३ ते २००८ या कालावधीत इंग्लंडचे नेतृत्व करणाऱ्या वॉनने दिला आहे. ‘‘प्रक्षेपणकत्र्यांचे तीन दिवस रिक्त जात आहेत, परंतु तरीही निर्मितीचे पैसे त्यांनी मोजले आहेत. यापुढे अशा प्रकारच्या खराब खेळपट्ट्या तयार करणाऱ्या क्रिकेट मंडळांबाबत त्यांना पुनर्विचार करावा लागेल,’’ असे वॉनने म्हटले आहे.

काय म्हणाले होते सुनील गावसकर?
बरेचसे खेळाडू सरळ जाणाऱ्या चेंडूंवर बाद झाले. अतिबचावात्मक पवित्रा फलंदाजांना नडला. त्यामुळे खेळपट्टीला दोष देण्यापेक्षा विजयाचे श्रेय अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या भारताच्या फिरकीपटूंना जाते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The pitch icc indian team cricket sunil gavaskar michael wan 3rd test nck
First published on: 28-02-2021 at 12:48 IST