सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी उशिराने पदार्पण केले, परंतु फार कमी वेळात तो भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख फलंदाज बनला. भारताकडून एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट खेळणारा सूर्यकुमार यादव अद्याप कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकलेला नाही. सूर्यकुमार यादव सध्या टीम इंडियासोबत मिचेल टी२० विश्वचषक २०२२ साठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे.

या स्पर्धेतील भारताच्या ग्रुप बी सामन्यात नेदरलँड्स विरुद्ध सूर्यकुमार यादवने नाबाद ५१ धावा केल्या आणि त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. त्याचवेळी टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक आणि क्रिकेटर तसेच समालोचक रवी शास्त्री यांनी त्यांच्याशी संवाद साधला. शास्त्री आणि सूर्यकुमार यांच्यातील या संभाषणाचा व्हिडिओही आयसीसीने आपल्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केला आहे. या संवादादरम्यान रवी शास्त्री सूर्यकुमार यादवबद्दल म्हणाले की, “तो तीन फॉरमॅटचा खेळाडू आहे. शास्त्रींचे हे शब्द ऐकून सूर्यकुमार मोठ्याने हसला.”

त्यानंतर शास्त्री म्हणाले की, “मला माहित आहे की तो कसोटी क्रिकेटबद्दल स्वतःहून काही बोलणार नाही, पण तो कसोटी क्रिकेट खेळू शकतो. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की सूर्या सर्वांना आश्चर्यचकित करून सोडेल.  सुर्यकुमारला कसोटी क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवा आणि म्हणजे तो ताबडतोड फलंदाजी करेन आणि धावसंख्या वाढवण्यास मदत होईल.” यावर सूर्यकुमार यादवने उत्तर दिले की, “जेव्हा मी पदार्पण करत होतो, तेव्हा त्यांनी (रवी शास्त्री) मला फोन केला आणि म्हणाले, ‘जके बिंदास देना और ये मुझे याद है आणि अशीच फलंदाजी करायला मला आवडते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्याला सांगूया की सूर्यकुमार यादवने आतापर्यंत भारतासाठी १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३४ च्या सरासरीने ३४० धावा केल्या आहेत, तर ३६ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने ३९.४७ च्या सरासरीने ११११ धावा केल्या आहेत, ज्यात त्याने या वर्षी केलेल्या शतकाचा समावेश होता. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या ११७ धावा आहे.