Shoaib Malik Criticizes Babar Azam : टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर ८ फेरीत पाकिस्तानचा संघ पोहोचू शकला नाही. त्यामुळे पाकिस्तान संघ आणि बाबर आझम यांच्यावर चाहते आणि माजी खेळाडू बरीच टीका करत आहेत. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकनेही बाबर आझमवर निशाणा साधला आहे. तो म्हणाला, बाबरच्या जागी मी असतो तर राजीनामा दिला असता. शोएबचे मलिकचे हे वक्तव्य पाकिस्तानने शेवटच्या सामन्यात आयर्लंडविरुद्ध ३ विकेट्सनी विजय मिळवल्यानंतर आले आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मी बाबरच्या जागी असतो, तर राजीनामा दिला असता –

बाबर आझमच्या संदर्भात टेन स्पोर्ट्सशी बोलताना शोएब मलिक म्हणाला, “जर मी बाबरच्या जागी असतो, तर मी राजीनामा दिला असता आणि इथून मी माझ्या फलंदाजी आणि क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित केले असते. कारण हे माझ्यासोबतही असेच घडले होते. २००९-१० मध्ये मला पुन्हा कर्णधारपद देण्याची चर्चा होती पण मी ते स्वीकारले नाही.”

शोएब मलिक बाबर आझमवर संतापला –

शोएब मलिक पुढे म्हणाला की, “तेव्हा माझ्याकडे एकच कारण होतं की मला माझ्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचं होतं. यामुळेच मी पुन्हा कर्णधारपद स्वीकारण्याचा विचार केला नाही. बाबरने आता तेच करायला हवे. बघा, मी हे नुसते बोलत नाही, त्यांचे नंबरही तुमच्यासमोर आहेत. जर मी त्याच्या जागी असतो तर माझ्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी नक्कीच राजीनामा दिला असता.” दुसरीकडे बाबर आझमने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर आपल्या कर्णधारपदाबद्दल बोलताना सांगितले की, “जेव्हा मी कर्णधारपद सोडले, तेव्हा मला वाटले की मी यापुढे कर्णधार राहू नये आणि मी स्वत: ते घोषित केले होते.

हेही वाचा – तौहीद हृदोयच्या विकेटनंतर नेपाळी चाहत्याच्या आनंदाला उरला नाही पारावार, स्विमिंग पूलमध्ये उडी मारल्याचा VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे बाबर आझमने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर आपल्या कर्णधारपदाबद्दल बोलताना सांगितले की, जेव्हा मी कर्णधारपद सोडले तेव्हा मला वाटले की मी यापुढे कर्णधार राहू नये आणि मी स्वत: ते जाहीर केले होते. यानंतर पीसीबीने पुन्हा माझ्याकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली, हा त्यांचा निर्णय होता. आता आपण परत जाऊ आणि येथे काय घडले यावर चर्चा करू. मी पुन्हा कर्णधारपद सोडले तर सर्वांना कळवीन. आत्तापर्यंत, मी याबद्दल विचार केलेला नाही आणि हा निर्णय पीसीबीला घ्यावा लागेल.”