भारतीय क्रिकेट संघाचा पहिला विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव हे त्यांच्या स्पष्टवक्‍त विधानांसाठी ओळखले जातात. कुठलाही आडपडदा न ठेवता तो अनेकवेळा अशी विधानेही करतो, जो क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय बनतो. त्याचे असेच एक विधान आता समोर आले आहे ज्यात त्याने भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे. कपिलच्या मते, हे दोन खेळाडू भारताला कधीच विश्वचषक जिंकून देणार नाहीत.

क्रिकेटजगतात भारतीय संघाकडे एक मजबूत संघ म्हणून पाहिले जाते. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल तीन संघांमध्ये असलेल्या भारतीय संघाला आयसीसीच्या स्पर्धांमध्ये मात्र मागील काही वर्षांपासून सातत्याने अपयश येत आहे. २०१३ चॅम्पियन ट्रॉफीपासून भारताच्या वरिष्ठ संघाने एकही आयसीसी स्पर्धा आपल्या नावे केली नाही. संघात अनेक बडे खेळाडू असतानाही भारतीय संघ आयसीसी ट्रॉफी उंचावण्यापासून वंचित राहिला आहे. याच मुद्द्यावर आता भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी भाष्य केले आहे.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: “निम्म्या खेळाडूंना तर इंग्लिशही समजत नाही…” RCB संघासह मॅनेजमेंटवरही भडकला वीरेंद्र सेहवाग
Manoj Tiwary's statement on Shivam Dube
Team India : ‘विश्वचषकासाठी शिवम दुबेची निवड न झाल्यास CSK जबाबदार असेल..’ भारताच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य
Rohit Sharma statement regarding the World Cup 2027 sport news
पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास उत्सुक! इतक्यातच निवृत्तीचा विचार नाही; रोहितचे वक्तव्य

कपिल देव यांनी “एबीपी न्यूज’शी संवाद साधताना सांगितले की, “जर तुम्हाला वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर प्रशिक्षक, निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन यांना काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. वैयक्तिक हितसंबंध मागे ठेवावे लागतील आणि त्यांचा विचार करावा लागेल. संघ. जर विराट, रोहित किंवा २-३ खेळाडूंवर विश्‍वचषक जिंकण्यासाठी आम्ही विश्‍वास ठेवला तर असे कधीच होऊ शकत नाही.”

हेही वाचा: IND vs SL 1st T20: शिवमला १०० आणि शुबमनला १०१ क्रमांकाचीच पदार्पण कॅप का मिळाली? जाणून घ्या ‘हे’ खास कारण

कपिल पुढे म्हणाला, “तुम्ही तुमच्या टीमवर विश्वास ठेवला पाहिजे. आमच्याकडे अशी टीम आहे का? नक्की. आमच्याकडे असे मॅच विनिंग खेळाडू आहेत का? होय, नक्कीच. आमच्याकडे असे खेळाडू आहेत जे वर्ल्ड कप जिंकू शकतात.” कपिल म्हणतो की, “भारताकडे विश्वचषक जिंकणारा संघ आहे आणि असे प्रतिभाशाली खेळाडू आहेत जे ते शक्य करू शकतात. पण केवळ एक किंवा दोन खेळाडूंवर अवलंबून राहू शकत नाही आणि मोठ्या सामन्यांमध्ये युवा खेळाडूंनाही पुढे यावे लागेल.”

माजी विश्वचषक विजेत्या कर्णधाराने पुढे पुढे सांगितले की, “तुमच्या संघाचे आधारस्तंभ असे काही खेळाडू नेहमीच असतात. संघ त्यांच्याभोवती फिरतो, परंतु आम्हाला ही परंपरा मोडून ५-६ खेळाडू विकसित करावे लागतील.” म्हणूनच मी म्हणा की तुम्ही विराट आणि रोहितवर अवलंबून राहू शकत नाही. तुम्हाला अशा खेळाडूंची गरज आहे जे आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतील. तरुणांनी पुढे येऊन सांगायला हवे की हीच आमची वेळ आहे.

हेही वाचा: BCCI Selection Committee: बीसीसीआयची निवडसमितीसाठी तयारी पूर्ण! CAC ने घेतली अर्जदारांची मुलाखत, चेतन शर्मांचं ‘पुनरागमन’?

“भारतीय संघ मजबूत आहे यात शंका नाही. मात्र, आपल्याला आता विराट, रोहित आणि अन्य एक दोन खेळाडूंच्या पुढे पाहावे लागेल. या अशा दोन-तीन खेळाडूंवरच पूर्ण लक्ष केंद्रित केले तर आपण जिंकण्याची शक्यता कमी आहे. संघात किमान सहा-सात खेळाडू असे हवेत, जे मॅचविनर असतील. त्यासाठी संघ व्यवस्थापनाला नक्कीच काहीतरी कठोर पावले उचलावी लागतील. आपल्याकडे असे खेळाडू आहेत, जे नक्कीच ही भूमिका पार पाडतील.”, अशा शब्दात त्यांनी संघ व्यवस्थापनाला खडेबोल सुनावले.