टी२० विश्वचषक २०२२ मध्ये भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा कर्णधार म्हणून शानदार कामगिरी करत आहे. रोहित भारतीय संघाला या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यापर्यंत घेऊन गेला आहे. रविवारी (दि. ०६ नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात या स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीतील शेवटचा सामना पार पडला. हा सामना भारताच्या पारड्यात पाडला. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला हरवत मोठा अपसेट केला. त्यामुळे पाकिस्तानचा उपांत्य फेरीसाठीचा रस्ता मोकळा झाला. पाकिस्ताने बांगलादेशवर पाच गडी राखून विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे ग्रुप २ मधून भारत आणि पाकिस्तान या दोन संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे.

तर ग्रुप १ मध्ये न्यूझीलंडने आयर्लंडवर मोठा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ग्रुप १ मध्ये  ७ गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करणारा न्यूझीलंड हा पहिला संघ ठरला होता. तर इंग्लंडने ही श्रीलंकेला धूळ चारत ग्रुप १ मधून उपांत्य फेरीत पोहचण्याचा दुसरा मान पटकावला. पण न्यूझीलंड आणि इंग्लंड यांचे गुण जरी समान असले तरी देखील नेट रनरेट मात्र न्यूझीलंडचा चांगला असल्याने ते पहिल्या क्रमांकावर आहेत.

हेही वाचा :   T20 World Cup 2022: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली पहिल्यांदाच ठरला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’

आता ग्रुप १ मधील पहिला संघ हा ग्रुप २ मधील दुसऱ्या संघाशी ९ नोव्हेंबरला पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात भिडणार आहे. तर उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामना हा ग्रुप २ मधील पहिला संघ आणि ग्रुप १ मधील पहिला संघ यांच्यात १० नोव्हेंबरला होणार आहे. म्हणजेच न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान आणि भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीतील सामने रंगणार आहेत.

याच दोन उपांत्य फेरीतील सामन्यांसाठी आयसीसीने अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यासाठी मॅरेस इरास्मस आणि रिचर्ड इलिंगवर्थ हे मैदानावरील पंच असणार आहेत तर रिचर्ड केटलबरो तिसरे पंच आणि मायकेल गॉफ हे चौथे पंच असणार आहे. न्यूझीलंड-पाकिस्तान सामन्यासाठी ख्रिस ब्रॉड सामनाधिकारी म्हणून असणार आहेत.

हेही वाचा :   बुंदेसलीगा फुटबॉल लीग सामन्यादरम्यान ‘फिफा विश्वचषक बॅन’ झळकले पोस्टर्स, काय आहे नेमके कारण जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यासाठी कुमार धर्मसेना आणि पॉल रीफेल हे मैदानावरील (ऑन-फिल्ड) पंच असणार आहेत्त. तर ख्रिस गॅफनी तिसरे पंच आणि रॉड टकर (चौथे पंच) असणार आहेत. भारत-इंग्लंड सामन्यासाठी डेव्हिड बून सामनाधिकारी असणार आहेत. अंतिम सामन्यासाठीच्या अधिकाऱ्यांची निवड ही १२ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे.