India vs Australia 2023 2nd ODI Match Updates:भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० ने आघाडी घेतली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना आज विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सामन्याला दुपारी १:३० पासून सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हार्दिक पांड्याने मागच्या सामन्यात कर्णधारपदाची उत्तम कामगिरी केली होती. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजच्या घातक गोलंदाजीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला १८८ धावांवर रोखले. यानंतर केएल राहुल फॉर्ममध्ये परतला आणि त्याने नाबाद अर्धशतक झळकावले. त्याचवेळी रवींद्र जडेजाने अष्टपैलू कामगिरी केली. या सामन्यातही शमी, सिराज, राहुल आणि जडेजा यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा असेल. त्याचबरोबर गेल्या सामन्यात भारतीय टॉप ऑर्डर अपयशी ठरली होती. त्यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians IPL 2024 Live Score in Marathi
IPL 2024 SRH vs CSK Highlights: चेन्नईचा सलग दुसरा पराभव, हैदराबादने ६ विकेट्सने सहज जिंकला सामना
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

पावसाची शक्यता –

वास्तविक, हवामानाच्या अंदाजानुसार, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान पाऊस टीम इंडियाचे मनसुबे बिघडू शकतो. एक्यूवेदर च्या अहवालानुसार विशाखापट्टणममध्ये रविवारी अडीच ते तीन तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशाखापट्टणममध्ये पावसाची शक्यता जवळपास ८० टक्के आहे. दुपारी दीड वाजता सामना सुरू होणार आहे. दिवसा दोन तास आणि संध्याकाळी सुमारे एक तास आणि रात्रीही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – WPL 2023 RCBW vs GGW: आरसीबीचा सलग दुसरा विजय, गुजरातचा आठ गडी राखून पराभव; सोफी डिव्हाईनची वादळी खेळी

पावसामुळे सामन्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भारताचा विजय रथ रोखला जाऊ शकतो. भारतीय संघाने या वर्षात आतापर्यंत सात एकदिवसीय सामने खेळले असून सातही जिंकले आहेत. भारतीय संघाने वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्धची तीन एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकून केली. यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडचाही क्लीन स्वीप केला.

भारत आणि ऑस्ट्रेलियाची आकडेवारी –

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकमेव एकदिवसीय सामना २०१० मध्ये विशाखापट्टणम येथे खेळला गेला होता. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. एकूण विक्रमाबद्दल बोलायचे तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण १४४ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ऑस्ट्रेलियाने यापैकी ८० सामने जिंकले आहेत, तर भारताने ५४ सामने जिंकले आहेत. १० सामने अनिर्णित राहिले.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (यष्टिरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा