बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात पहिला एकदिवसीय सामना रविवारी (४ डिसेंबर) ढाका येथे खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याचा हा निर्णय अतिशय योग्य ठरल्याचे दिसले, कारण भारताने पहिल्या चार विकेट १००च्या आतच गमावल्या. केएल राहुल याने ७३ धावा केल्याने भारताने ४१.२ षटकात सर्वबाद १८६ धावसंख्या उभारली.

टीम इंडियात विराट कोहलीच्या फिटनेसचं उत्तर नाही. यामुळेच तो संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. याचा पुरावा तो दररोज आपल्या क्षेत्ररक्षणाने देत असतो. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने शाकिब-अल-हसनला मिड-एअरमध्ये झेल देऊन आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांना आश्चर्यचकित केले. शाकिब अल हसनने पहिल्या गोलंदाजीत ५ गडी बाद करत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले होते, तर फलंदाजीतही तो भारतीय गोलंदाजांसमोर अडचणी निर्माण करण्यात व्यस्त होता. शाकिब ३८ चेंडूत २९ धावांवर खेळत असताना वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने झेलबाद केले आणि त्याला तंबूत परत जावे लागले.

कोहलीने शाकिबचा बदला घेतला

याआधी टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत असताना विराट कोहलीला शाकिब अल हसनने बाद केले होते. विराट ९ धावा करून बाद झाला. त्याला लिटन दासने अप्रतिम झेल घेत तंबूत पाठवले. शाकिबकडून विराटचा बदला घेत तो शानदार झेल टिपून बाद झाला.

शाकिबने या सामन्यात ३८ चेंडूंचा सामना केला आणि तीन चौकारांच्या मदतीने २९ धावा केल्या. अर्थात शाकिबला बॅटने फार काही दाखवता आले नाही, पण त्याने आपल्या फिरकीने भारतीय फलंदाजांना खूप त्रास दिला. शकिबने पाच भारतीय फलंदाजांना आपले बळी बनवले. कोहलीशिवाय त्याने रोहित शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर यांच्या विकेट घेतल्या. शकीबने १० षटकात ३६ धावा देत पाच बळी घेतले. त्याच्याशिवाय इबादत हुसेनने चार बळी घेतले. मेहेदी हसन मिराजने एक गडी बाद केला.

हेही वाचा : Lakshya Sen: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता लक्ष्य सेन विरोधात गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली आणि संघ पूर्ण षटकही खेळू शकला नाही. टीम इंडिया ४१.२ षटकात केवळ १८६ धावा करून बाद झाली. केएल राहुल वगळता संघाचा एकही फलंदाज टिकू शकला नाही. त्याने ७३ धावांची खेळी खेळली. राहुल टी२० विश्वचषकानंतर संघात परतत होता. टी२० विश्वचषकात त्याची कामगिरी चांगली नव्हती. मात्र बांगलादेश दौऱ्याची सुरुवात योग्य पद्धतीने झाली आहे.