India vs Bangladesh, World Cup 2023: आज एकदिवसीय विश्वचषक २०२३चा १७वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून आतापर्यंतचे तीनही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, बांगलादेश संघाने तीनपैकी एक सामना जिंकला असून दोन गमावले आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्णधार शकीब अल हसन बांगलादेशकडून खेळत नाही. त्याच्या संघासाठी हा मोठा धक्का आहे. शाकिब हा संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या जागी नझमुल हसन शांतो कर्णधार आहे. त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. अशा स्थितीत नाणेफेक हरल्यानंतरही फारसे नुकसान होत नाही. रोहितने प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

IND vs ENG Gautam Gambhir may be unhappy with Rohit Sharma duos intense chat triggers speculations after video viral
IND vs ENG : गौतम गंभीर रोहित शर्मावर नाराज? सामन्यानंतरचा VIDEO व्हायल झाल्यानंतर चर्चेला उधाण
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Shreyas Iyer Reveals How He Replaces Virat Kohli on Rohit Sharma Phone Call in India Playing XI
IND vs ENG: “मी रात्री चित्रपट बघत होतो अन् रोहितचा फोन…”, श्रेयस अय्यरने सांगितलं कसं झालं टीम इंडियात पुनरागमन, सामन्यानंतर काय म्हणाला?
IND vs ENG Harshit Rana creates all time unwanted record for India on ODI debut against England in Nagpur
IND vs ENG : आधी धुलाई, नंतर जबरदस्त कमबॅक…पदार्पणवीर हर्षित राणाने पुनरागमन करत सामन्याला दिली कलाटणी
IND vs ENG Stampede scenes during 2nd ODI ticket sale in Cuttack few fans fall unconscious
IND vs ENG: भारत-इंग्लंड वनडे तिकिट विक्रीदरम्यान कटकमध्ये चेंगराचेंगरी, काही जण झाले बेशुद्ध; VIDEO व्हायरल
IND vs ENG Kevin Pietersen statement on Virat Kohli and Rohit Sharma During the discussion of Retirement
IND vs ENG : ‘विराट-रोहित रोबो नाहीत…’, वनडे मालिकेपूर्वी इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘लोकांनी त्यांना…’
IND vs ENG Jasprit Bumrah To Miss ODI Series Against England Suspense on Playing Champions Trophy
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध वनडे संघातून जसप्रीत बुमराहचं नाव गायब, BCCIचं मौन; चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार?
IND vs ENG I dont think the toss went against us says Varun Chakravarthy after England defeat India at at Rajkot
IND vs ENG : नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा टीम इंडियाचा निर्णय महागात पडला का? वरुण चक्रवर्तीने दिले ‘हे’ उत्तर

१९९८ नंतर भारतातील उभय संघांमधील पहिला एकदिवसीय सामना

भारतीय भूमीवर दोघांमधील हा केवळ चौथा एकदिवसीय सामना असेल. भारतातील वनडेमध्ये दोन्ही संघ केवळ तीन वेळा आमनेसामने आले आहेत. २५ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९८ मध्ये भारतीय भूमीवर दोघेही शेवटचे आमनेसामने आले होते. भारताने घरच्या मैदानावर तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये बांगलादेशचा पराभव केला आहे. १९९० मध्ये चंडीगडमध्ये भारताने बांगलादेशचा नऊ विकेट्सने पराभव केला होता.

यानंतर १९९८ मध्ये मोहालीत बांगलादेशचा ५ गडी राखून पराभव झाला होता. १९९८ मध्येच वानखेडेवर भारताने बांगलादेशचा पाच गडी राखून पराभव केला होता. २५ वर्षांनंतर बांगलादेशचा संघ भारतीय भूमीवर खेळायला येईल तेव्हा त्यांच्या मनात हा विक्रम नक्कीच असेल. मात्र, ही लढत रंजक असणार आहे. या तीन सामन्यांव्यतिरिक्त, भारताने बांगलादेशमध्ये २५ सामने आणि कोणत्याही तटस्थ ठिकाणी १२ सामने खेळले आहेत.

एकदिवसीय विश्वचषकातील दोन्ही संघांचे विक्रम

एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघ चार वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने तीन सामने जिंकले असून बांगलादेशने केवळ एकच सामना जिंकला आहे. पोर्ट ऑफ स्पेन येथे २००७च्या विश्वचषकात दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने आले होते. त्या सामन्याची इतिहासाच्या पानात नोंद झाली.

बांगलादेशने ग्रुप स्टेजमध्ये राहुल द्रविडच्या भारतीय संघाचा पाच गडी राखून पराभव करून मोठा अपसेट निर्माण केला. यानंतर टीम इंडिया वर्ल्ड कपमधूनच बाहेर पडली. २०११च्या विश्वचषकात, मीरपूरमध्ये ग्रुप स्टेजमध्ये दोघे पुन्हा आमनेसामने आले. यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बांगलादेशचा ८७ धावांनी पराभव केला. या सामन्यात वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली यांनी शतके झळकावली होती. यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१५ मध्ये मेलबर्न येथे झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बांगलादेशचा १०९ धावांनी पराभव केला होता. २०१९ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बर्मिंगहॅममध्ये बांगलादेशचा २८ धावांनी पराभव केला. आता २०२३च्या विश्वचषकात दोघांमधील हा पाचवा सामना असेल.

हेही वाचा: IND vs BAN, World Cup: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीने टीम इंडियाला दिला सल्ला; म्हणाला, “हलक्यात घेऊ नका…”

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

बांगलादेश: लिटन दास, तनजीद तमीम, मेहदी हसन मिराज, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), नसुम अहमद, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.

Story img Loader