भारतीय संघाच्या पाठीमागे लागलेले शुक्लकाष्ट काही संपायचे नाव घेत नाही आहे. आधीच संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. आता केएल राहुल हा पण दुखापतग्रस्त झाल्याचे समोर येत आहे. त्याची दुखापत किती गंभीर हे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी सांगितले आहे. राहुलला अभ्यास सत्रादरम्यान हाताला दुखापत झाली. तो ठिक असल्याचे समोर येत आहे, मात्र तसे झाले नाहीतर भारताला त्याच्याशिवाय खेळावे लागणार आहे.

ताज्या वृत्तानुसार, गुरुवारपासून मीरपूर येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान केएल राहुलला दुखापत झाली आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे आधीच दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी कर्णधारपद भूषवणारा संघाचा उपकर्णधार केएल राहुलही जखमी झाला आहे. अलीकडील अहवालानुसार, केएल राहुल मीरपूरमध्ये फलंदाजीच्या सरावासाठी थ्रो-डाउन घेत असताना चेंडू हाताला लागल्याने तो जखमी झाला.

Sourav Ganguly Reacts After Sunil Gavaskar Called Dhruv Jurel The Second Rising MS Dhoni
Sourav Ganguly : ‘माही’भाईशी जुरेलची तुलना होताच ‘दादा’ची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनीला धोनी बनण्यासाठी…”
gujarat giants
WPL 2024 : गुजरात जायंट संघाला मिळालीय ‘ही’ विशेष परवानगी; जाणून घ्या कारण…
kl rahul still not fit likely to miss 5th Test against england in dharamsala
केएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच
Sarfaraz Khan's Cricket Journey
Sarfaraz Khan : ‘…तर रेल्वेमध्ये कपडे विकायला जाऊ शकतो’, सर्फराझच्या वडिलांना आठवला ‘तो’ भावनिक प्रसंग

संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी माध्यमांशी बोलताना थोडा दिलासा दिला असला तरी. तो म्हणाला, “त्याची दुखापत गंभीर दिसत नाही. तो बरा दिसतोय. आशा आहे की तो बरा होईल. डॉक्टर त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत, पण तो तंदुरुस्त होईल अशी आशा आहे.”

कोण होणार कर्णधार?

नियमित कर्णधार रोहित शर्माच्या दुखापतीनंतर आता केएल राहुलची दुखापतही संघासाठी अडचणीची ठरत आहे. अशा परिस्थितीत केएल राहुल दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नसेल, तर संघाचे नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा परिस्थितीत केएल राहुलसोबत पहिल्या कसोटीत उपकर्णधार असलेला चेतेश्वर पुजारा संघाची कमान सांभाळताना दिसेल.

सलामीवीर कोण असेल?

दुसरीकडे, सलामीबद्दल बोलायचे झाले तर, केएल राहुल अनुपस्थित राहिल्यास त्याची जागा अभिमन्यू ईश्वरनला दिली जाऊ शकते. रोहित शर्मा दुखापतग्रस्त असताना नुकतेच इसवरनला टीम इंडियात सामील करण्यात आले. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले. आता जर राहुल मैदानात उतरला नाही तर ईश्वरनला पदार्पणाची संधी मिळू शकते.

हेही वाचा:   Ramiz Raja: मोठी बातमी! भारतावर आगपाखड करणाऱ्या पीसीबीच्या अध्यक्षांची पडली विकेट, ‘या’ चेहऱ्याला मिळाली संधी

विशेष म्हणजे १४ डिसेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने १८८ धावांनी विजय मिळवला. आता या मालिकेतील दुसरा सामना २२ डिसेंबरपासून ढाका येथे होणार आहे.