India vs West Indies 3rdT20I Live Update: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच टी२० मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (८ ऑगस्ट) संपन्न झाला. ‘मिस्टर ३६०’ अशी ओळख असणाऱ्या सूर्यकुमार यादवने वादळी खेळी केली. त्याच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजवर सात विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. सूर्यकुमार यादवने ४४ चेंडूत ८३ धावा करून बाद झाला आहे. त्याने आपल्या खेळीत १० चौकार आणि ४ षटकार मारले. भारताने या विजयासह मालिकेतील आव्हान कायम राखले आहे. मात्र तरीही वेस्ट इंडीज २-१ने आघाडीवर आहे.

भारताने तिसऱ्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजचा सात विकेट राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेत कायम आहे. भारताच्या विजयानंतर मालिकेतील स्कोअर २-१ असा वेस्ट इंडिजच्या बाजूने आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १५९ धावा केल्या आणि भारताने तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. सूर्यकुमार यादवला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Jake Fraser's Second Fastest Half-Century for Delhi in DC vs MI Match
DC vs MI : जेक फ्रेझरने वादळी अर्धशतक झळकावत रचला इतिहास, दिल्लीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
Royal Challengers Bangalore Vs Kolkata Knight Riders Match Highlights in Marathi
KKR vs RCB : रोमहर्षक सामन्यात केकेआरचा आरसीबीवर एका धावेने निसटता विजय, विल जॅक्सची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians IPL 2024 Live Score in Marathi
IPL 2024 SRH vs CSK Highlights: चेन्नईचा सलग दुसरा पराभव, हैदराबादने ६ विकेट्सने सहज जिंकला सामना

भारताने वेस्ट इंडिजवर सात विकेट्सने मात करत प्रथमच मालिका जिंकली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने पाच विकेट्सवर १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १७.५ षटकांत तीन गडी गमावून १६४ धावा करून सामना जिंकला. वेस्ट इंडिजकडून ब्रेंडन किंगने ४२ आणि रोव्हमन पॉवेलने ४० धावा केल्या. त्याच वेळी, अल्झारी जोसेफने चेंडूसह दोन विकेट्स घेतले. त्याचवेळी भारताकडून प्रथम कुलदीप यादवने तीन विकेट्स घेतले, त्यानंतर सूर्यकुमार यादवने ८३ आणि तिलक वर्माने नाबाद ४९ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासाठी हा करा किंवा मरोचा सामना आहे कारण वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या टी२० मध्ये भारताचा ४ धावांनी आणि दुसऱ्या सामन्यात २ विकेटने पराभव झाला. अशा स्थितीत नुकत्याच झालेल्या पराभवात हार्दिक ब्रिगेड विजयाच्या मार्गावर परतली आहे. या विजयासह भारताने दमदार पुनरागमन केले असून, पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया अद्याप कायम आहे. वेस्ट इंडिजने दोन आणि भारताने एक सामना जिंकला आहे. ही मालिका जिंकण्यासाठी भारताला उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील. त्याचवेळी वेस्ट इंडिज संघाने दुसरा सामना जिंकताच मालिका जिंकली. या मालिकेतील उर्वरित दोन सामने शनिवार आणि रविवारी होणार आहेत.

दोन्ही संघांची प्लेईंग ११

भारत: शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज: ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय.