मोहाली येथे झालेला भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी समना अनेक अंगांनी चर्चेचा विषय ठऱला. भारताने श्रीलंकेला एक डाव आणि २२२ धावांनी पराभूत केले. भारताच्या या विजयासाठी अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने मोठे योगदान दिले. १७५ धावा करुन त्याने भारताचा धावफलक ५७४ पर्यंत नेऊन ठेवला. तसेच गोलंदाजीमध्येही त्याने ९ बळी घेऊन भारतासाठी विजय आणखी सोपा केला. भारताने या विजयासह श्रीलंकेविरोधात १-० अशी आघाडी घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने आपला पहिला डाव ५७४ धावांवर घोषित केला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकन खेळाडूंनी पहिल्या दिवशी ४३ षटकांत १०८ धावा केल्या. तर पहिल्या डावात श्रीलंकेने एकूण १७४ धावा केल्या. पहिल्या डावात पाथून निसंका वगळता श्रीलकेच्या एकाही खेळाडूने चांगली कामगिरी केली नाही. निसंकाने पहिल्या डावात १३३ चेंडूमध्ये ११ चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. तर श्रीलंकेचे तब्बल चार गडी शून्यावर बाद झाले. धनंजय सिल्व्हाने फक्त एक धाव केली. याचा फटका अखेर श्रीलंकेला बसला. भारताने श्रीलंकेचा पहिला डाव १७४ धावांवर गुंडाळून लगेच फॉलोऑन दिला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs sri lanka 1st test match india won know all updates in marathi prd
First published on: 06-03-2022 at 18:32 IST