पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये आरसीबीचा कर्णधार राहणार नसल्याचे विराट कोहलीने आधीच जाहीर केले होते. अशा स्थितीत संघाला नवा कर्णधार शोधावा लागणार आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, या पदासाठी मुंबईकर श्रेयस अय्यर किंवा केएल राहुल यांची निवड केली जाऊ शकते. यासाठी दोघांचीही दावेदारांमध्ये गणना केली जात आहे.

डीएनएच्या वृत्तानुसार, या रिक्त पदासाठी राहुल आणि अय्यर हे प्रबळ दावेदार आहेत. कोहलीच्या कार्यकाळात आरसीबीला विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात अपयश आले. यंदा आयपीएलसाठी मेगा लिलाव होणार आहे, त्यामुळे आरसीबीलाही संघात कोणती नावे समाविष्ट करायची आहेत, हे पाहावे लागेल. लेखी यादी बाहेर येण्यासाठी सर्वांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामध्ये कोणते खेळाडू सहभागी होणार हेही महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबत बीसीसीआयने यापूर्वीच सूचना जारी केल्या आहेत.

हेही वाचा – विराटला टीम इंडियातून मिळणार होता डच्चू! सेहवागचा मोठा खुलासा; म्हणाला, “धोनी आणि…”

केएल राहुलने पंजाब किंग्जचे कर्णधार असताना वैयक्तिकरित्या चांगली कामगिरी केली. परंतु तो संघाला विजेतेपद मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. राहुलने सलग दोन मोसमात फलंदाजीत शानदार कामगिरी केली. अशा परिस्थितीत जर त्याने आरसीबीमध्ये जाऊन कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली, तर तिथे त्याचा खेळ पाहण्यासारखा असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रेयस अय्यरने गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद भूषवले होते. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीने अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. यावेळी दुखापतीमुळे त्याच्या जागी ऋषभ पंतला कर्णधार करण्यात आले. मात्र, यावेळीही दिल्लीचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला. अशा परिस्थितीत पंतला कर्णधारपदी ठेवून संघाला पुढे नेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.