Mohammed Shami Mother: भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी विश्वचषक स्पर्धेनंतर आपल्या घरी परतला आहे. शमीने आईबरोबरचा एक फोटोही शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना शमीने लिहिले की, त्याची आई त्याच्यासाठी खूप आहे. आई लवकरच बरी होईल, अशी आशाही शमीने व्यक्त केली आहे. या फोटोमध्ये शमी आईला मिठी मारताना दिसत आहे.

मोहम्मद शमीने एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये चमकदार कामगिरी केली आणि सर्वाधिक २४ विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्या चार सामन्यांमध्ये शमीला खेळण्याची संधी मिळाली नाही, असे असतानाही त्याने सर्वांना मागे टाकत विकेट्स घेण्याच्या शर्यतीत पहिला आला. भारतीय भूमीवर वेगवान गोलंदाजाची ही कामगिरी अविश्वसनीय आहे. शमी हा वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.

Hyderabad man’s support empowers house help
गुलाबी सायकल अन् तिच्या चेहऱ्यावरील आनंद! स्वयंपाकीण ताईचे कष्ट वाचवण्यासाठी व्यक्तीने केली खास मदत, Viral Video
Man wraps utensils in plastic to avoid washing them.
भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
a story of self confidence chaturang article
जिंकावे नि जगावेही : आपल्या माणसांचं ‘असणं’!
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”

एकदिवसीय विश्वचषक फायनल दरम्यान शमीच्या आईची प्रकृती खालावली होती. त्यालाही रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, या काळात शमी देशासाठी सामनेही खेळत होता. टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र शमीच्या कामगिरीचे सर्वांनी कौतुक केले. ३३ वर्षीय मोहम्मद शमी पुढील विश्वचषकात टीम इंडियासाठी चमत्कार करू शकतो आणि परदेशी भूमीवर विश्वचषक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

विश्वचषकानंतर शमीने एका मुलाखतीत आपल्या आईबद्दल सांगितले की, “त्याचे कुटुंब त्याच्यासाठी खूप महत्वाचे आहे.” शमीने पुढे असेही सांगितले होते की, “त्याचे कुटुंबातील सदस्य त्याचे चांगले मित्र आहेत. शमीचे कुटुंब प्रत्येक अडचणीत त्याच्या पाठिशी होते. यामुळे तो या पदापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे.”

हेही वाचा: IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात पावसाची शक्यता? जाणून घ्या विशाखापट्टणमचे हवामान आणि खेळपट्टी अंदाज

विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघ जरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरला असला तरी आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली. टीम इंडियाने फायनल वगळता संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आणि सलग १० सामने जिंकले. आयसीसीने निवडलेल्या स्पर्धेतील सर्वोत्तम संघातही भारतीय खेळाडूंचा दबदबा दिसून आला. ११ पैकी सहा खेळाडू भारतातून निवडले गेले. विराट कोहलीने ११ डावात ७६५ धावा केल्या. तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. दुसरीकडे, मोहम्मद शमीने सात सामन्यांत २४ विकेट्स घेतल्या. तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. शमीच्या यशावर देशवासीय खूप अभिमान वाटत आहे.