मुंबई : डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलानी (७/९४ आणि ४/८२) आणि ऑफ-स्पिनर तनुष कोटियन (२/६० आणि ५/८२) यांच्या प्रभावी माऱ्यामुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील ब-गटातील दुसऱ्या सामन्यात हैदराबादचा एक डाव आणि २१७ धावांनी तिसऱ्या दिवशीच धुव्वा उडवला. यंदाच्या रणजी हंगामातील मुंबईचा हा सलग दुसरा विजय ठरला.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी हैदराबादने पहिल्या डावात ६ बाद १७३ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यांचे उर्वरित चार बळी अवघ्या ४१ धावांची भर घालून बाद झाले. त्यामुळे हैदराबादचा पहिला डाव २१४ धावांवर आटोपला. हैदराबादकडून रोहित रायडूने (७७) सर्वाधिक धावा केल्या. मुंबईच्या संघाला पहिल्या डावात ४३७ धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे त्यांनी हैदराबादला फॉलोऑन दिला.

दुसऱ्या डावातही हैदराबादला चांगली कामगिरी करता आली नाही. कर्णधार तन्मय अगरवाल (३९) आणि अक्षथ रेड्डी (२३) यांनी हैदराबादला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर राहुल बुद्धी (६५) आणि तनय त्यागराजन (नाबाद ३९) वगळता कोणत्याही फलंदाजाला फारशी चुणूक दाखवता आली नाही. त्यामुळे हैदराबादचा दुसरा डाव २२० धावांवर आटोपला. या वेळीही मुलानी आणि कोटियनच्या फिरकीसमोर हैदराबादच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. यापूर्वी, मुंबईने पहिल्या सामन्यात आंध्र प्रदेशवर नऊ गडी राखून विजय मिळवला होता.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : ६ बाद ६५१ डाव घोषित

’ हैदराबाद (पहिला डाव) : ६५.१ षटकांत सर्वबाद २१४ (रोहित रायडू ७७), तनय अगरवाल ४०; शम्स मुलानी ७/९४, तनुष कोटियन २/६०)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

’ हैदराबाद (दुसरा डाव) : ६७.२ षटकांत सर्वबाद २२० (राहुल बुद्धी ६५, तनय त्यागराजन नाबाद ३९; तनुष कोटियन ५/८२, शम्स मुलानी ४/८२)