भारतीय संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहेत. त्यामुळेच त्याला क्रिकेटचा देवही म्हटले जाते. सचिन तेंडुलकर हा आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०० शतके करणारा जगातील पहिला खेळाडू आहे. सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल, पण आता जेव्हा रेकॉर्ड्सचा विचार केला जातो तेव्हा सचिनचे नाव सर्वात वर येते.

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाशी संबंधित एक किस्सा आठवला. नोव्हेंबर १९८९ मध्ये जेव्हा पाकिस्तानी खेळाडूंनी त्याला घेरले आणि स्लेजिंग केले. तेव्हा सचिन फक्त १६ वर्षांचा होता. वेगवान गोलंदाज वकार युनूसचा वेगवान चेंडू सचिनच्या नाकावर आदळला तेव्हा शेजारी उभ्या असलेल्या जावेद मियाँदादने स्लेजिंग सुरू केली. संपूर्ण पाकिस्तानी संघ सचिन तेंडुलकरचे मनोधैर्य तोडण्यात व्यस्त होता. त्याचवेळी सचिनने इम्रान खानने आपल्या खेळाडूंना कशाप्रकारे फटकारले होते याची आठवण करून दिली. दुखापतग्रस्त असूनही त्याला मैदान सोडण्यापासून कशामुळे दूर ठेवले हेही मास्टर ब्लास्टरने उघड केले.

इन्फोसिसच्या या कार्यक्रमात सचिन म्हणाला, “माझा पहिला पाकिस्तान दौरा, आम्ही चौथी कसोटी खेळत होतो, आम्ही पहिले तीन ड्रॉ केले होते. चौथ्या कसोटीच्या शेवटच्या डावात आमची धावसंख्या ३६/४ होती. वकार युनूसचा बाऊन्सर मला नाकावर लागला, मला हेल्मेट घालायची सवय नव्हती आणि माझ्या चेहऱ्याला मार लागला. माझे नाक तुटून मी बसलो आणि मला रक्तस्त्राव झाला. यानंतर खेळ थांबवावा लागला. मी मैदान सोडले असते तर सामन्यावर पूर्णपणे पाकिस्तानचे वर्चस्व राहिले असते.”

सचिन पुढे म्हणाला, “जावेद मियाँदाद मला मारण्याचा प्रयत्न करत होता. ते सांगत होते, तुझे नाक तुटले आहे, तुला दवाखान्यात जावे लागेल. तेव्हा इम्रान खान त्याला म्हणाला, ‘जावेद, त्याला एकटे सोड. मी फलंदाजी सुरू ठेवली. हा एक क्षण होता जेव्हा मला वाटले की अशा प्रकारची दुखापत तुम्हाला बनवू शकते किंवा तोडू शकते.” सियालकोटमधील या सामन्यात ग्रीन-टॉप खेळपट्टीवर भारताची अवस्था ३८/४ अशी झाली होती आणि वकार युनूसच्या बाऊन्सी चेंडूनंतर सचिनच्या नाकातून रक्त वाहू लागल्याने गोष्टी गुंतागुंतीच्या दिसत होत्या. असे असूनही त्याने हार मानली नाही आणि उपचारासाठी ड्रेसिंग रूममध्ये जाण्याऐवजी तो आत्मविश्वासाने म्हणाला, “मी खेळेन.”

हेही वाचा: IND vs BAN 2nd Test: टीम इंडियाला पुन्हा दुखापतीचे ग्रहण! दुसऱ्या कसोटीपूर्वी रोहितपाठोपाठ ‘हा’ स्टार वेगवान गोलंदाज पडला बाहेर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही मालिका भारताने अनिर्णित ठेवली होती

त्यानंतर काही काळ खेळ थांबवण्यात आला. पाकिस्तानच्या खेळाडूंना कळून चुकले की हा काळ कठीण आहे. मी मैदान सोडले असते तर पाकिस्तान संघाने सामन्यावर वर्चस्व गाजवले असते. पाकिस्तान संघाला सामना लवकर संपवायचा होता.