पुरुषांच्या आगामी हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासमोर खडतर आव्हान असले तरी भारताने उपांत्य फेरीत मजल मारणे पुरेसे ठरेल, असे मत भारतीय संघाचे माजी कर्णधार परगट सिंग यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘गेल्या वर्षांपासूनची भारतीय संघाची कामगिरी पाहता, आपण उपांत्य फेरी गाठणे म्हणजे समाधानकारक कामगिरी म्हणावी लागेल. भारतीय संघ सध्या जागतिक क्रमवारीतही आठव्या स्थानी आहे. त्यातच रमणदीप सिंग आणि निकिम थिमय्या या अव्वल खेळाडूंना दुखापतीला सामोरे जावे लागले. अव्वल संघांबरोबर भारताने चांगली कामगिरी करायला हवी.’’
संग्रहित लेख, दिनांक 30th May 2014 रोजी प्रकाशित
भारताने उपांत्य फेरी गाठली तरी पुरेसे -परगट
पुरुषांच्या आगामी हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासमोर खडतर आव्हान असले तरी भारताने उपांत्य फेरीत मजल मारणे पुरेसे ठरेल, असे मत भारतीय संघाचे माजी कर्णधार परगट सिंग यांनी व्यक्त केले.
First published on: 30-05-2014 at 12:41 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Semifinal finish in wc will be big for indian hockey pargat