Shubman Gill being wrongly dismissed by the third umpire: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने ४६९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला आपल्या पहिल्या डावात २९६ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ८ बाद २७० धावांवर आपला डाव घोषित केला. तसेच भारतीय संघाला ४४४ धावांचे लक्ष्य दिले आहे. या धावांचा पाठलाग करताना शुबमन गिलला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याने वाद निर्माण झाला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर होत आहे.

भारताला पहिला झटका ४१ धावांवर बसला. स्कॉट बोलँडने शुबमन गिलला कॅमेरून ग्रीनकडे झेलबाद केले. मात्र, ग्रीनच्या झेलावरून वाद सुरू झाला. खरं तर, स्लिपमध्ये झेल घेत असताना, चेंडू ग्रीनच्या हातात अडकला आणि तो जमिनीवर घासला, पण तिसऱ्या अंपायरने त्याला आऊट दिले. समालोचन करताना दीप दासगुप्ता आणि हरभजन सिंगही शुबमन नाबाद असल्याचे म्हटले. त्यानंतर चाहतेही खूप संतापलेले दिसत होते.

त्याच वेळी, रोहित शर्मा आणि खुद्द शुबमन यांना आऊट घोषित केल्याबद्दल विश्वास बसत नव्हता. शुबमनला १९ चेंडूत १८ धावा करता आल्या. सध्या रोहित शर्मा २२ धावा करून क्रीजवर आहे. शुभमन आऊट होताच चहाची वेळ जाहीर झाली. भारताला अजून ४०३ धावांची गरज आहे. तसंच आधुनिक तंत्रज्ञान असतानाही थर्ड अंपायरने व्हिडीओ झूम आणि फ्रिझ केला नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांसह समालोचकांनी नाराजी व्यक्त केली. गिलला अंपायरने बाद दिल्यानंतर रोहित शर्माने अंपायरशी चर्चा केली. पंरतु, त्यानंतरही गिलला बाद देण्यात आलं आण टीम इंडियाला पहिला धक्का बसला.

हेही वाचा – IND vs AUS WTC Final: ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी ‘इंडिया जीतेगा’च्या दिल्या घोषणा, सोशल मीडियावर VIDEO होतोय तुफान व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला –

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात हेड आणि स्मिथच्या शतकाच्या जोरावर १२१.३ षटकांत सर्वबाद ४६९ धावा केल्या होत्या. यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकुरच्या अर्धशतकांच्या जोरावर ६९.४ षटकांत सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने अॅलेक्स कॅरीच्या अर्धशतकाच्या जोरावर ८४.३ षटकांत ८ बाद २७० धावांवर डाव घोषित केला. तसेच भारतीय संघासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले.