टीम इंडियाचा माजी अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आपल्या आक्रमक फलंदाजीने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतो. सेहवाग सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि तो त्याच्या चाहत्यांशी सतत गप्पा मारत असतो. दरम्यान, त्याने असाच एक धक्कादायक खुलासा केला असून, त्यानंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे या खुलाशात भारताचे माजी प्रशिक्षक आणि महेंद्रसिंग धोनीचे नाव आहे.

वीरेंद्र सेहवागने फलंदाजीचे सर्व विक्रम मोडले असले तरी, भारतीय संघाचा कर्णधार न होणे ही त्याची सर्वात मोठी हुकलेली संधी आहे आणि ही बाब त्याला नेहमी सलत राहते. २००३ आणि २०१२ दरम्यान, सेहवागने १२ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, ज्यात २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्यांच्या ऐतिहासिक पहिल्या-वहिल्या टी२० सामन्याचा समावेश होता. परंतु त्याचा नियमित कर्णधार म्हणून नाही, फक्त मुख्य कर्णधाराच्या अनुपस्थित त्याला कर्णधारपदाचे संधी मिळाली होती. सेहवागला भारतीय संघाचा कर्णधार होण्याची सुवर्ण संधी २००५ मध्ये ग्रेग चॅपेल प्रशिक्षक आणली होती, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सौरव गांगुलीला कर्णधारपद सोडण्यास भाग पाडले गेले आणि अखेरीस संघातून बाहेर पडल्यानंतर ही जबाबदारी राहुल द्रविडकडे सोपवण्यात आली.

IPL 2024 What Was That Thing on MS Dhoni Strapped on His Ankle
IPL 2024: मॅचनंतर धोनीच्या पायाला काय बांधण्यात येतं?
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’
Actor Sonu Sood made an anonymous post about trolling of Hardik Pandya
IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद
Rohit Sharma takes over, sends Hardik Pandya to the boundary in iconic role-reversal as MI captain feels SRH's wrath
VIDEO : हैदराबादच्या ‘रन’ धुमाळीसमोर हार्दिकने पत्करली शरणागती, रोहितने मुंबईचे नेतृत्व करताना पाठवले सीमारेषेवर

२००७ मध्ये, जेव्हा द्रविड पायउतार झाला तेव्हा एमएस धोनी टीम इंडियाचा कर्णधार झाला आणि सेहवागकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले, परंतु उपकर्णधारपदापुढे तो कधीही जाऊ शकला नाही. परदेशी विरुद्ध देशांतर्गत प्रशिक्षक वादावर लक्ष केंद्रित करताना, सेहवागने भारताचे कर्णधारपद मिळविण्याच्या जवळ कसे आलो हे सांगताना दोन्हीचे साधक-बाधक स्पष्टीकरण केले परंतु नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते. “जेव्हा ग्रेग चॅपल आले, तेव्हा चॅपलने पहिले विधान दिले होते की सेहवाग पुढचा कर्णधार असेल. कर्णधारपदाचे गाजर दाखवून थेट मला दोन महिन्यांत संघातून वगळण्यात आले. नक्की काय झाले हे त्यांनाच माहिती! कर्णधार होऊ द्या असे मी कधीच सांगितले नाही.” सेहवागने News18 शी बोलताना सांगितले.

हेही वाचा: WPL 2023, UP-W vs DC-W: ताहिला मॅकग्राचे झुंजार अर्धशतक! दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीत जाण्यासाठी १३९ धावांची गरज

“मला नेहमीच असा विश्वास आहे की आपल्या देशात भारतीय संघाचे व्यवस्थापन करू शकणारे चांगले प्रशिक्षक आहेत; त्यामुळे आम्हाला परदेशी प्रशिक्षकांची गरज नाही. पण जेव्हा मी खेळत होतो, तेव्हा मी माझ्या वरिष्ठांना हा प्रश्न विचारला होता, आम्हाला दुसऱ्या परदेशी प्रशिक्षकाची गरज का आहे? जॉन राईट नंतर भारतीय प्रशिक्षक का नाही झाले? माहिती नाही. भारतीय प्रशिक्षकांसोबत बराच वेळ घालवलेल्या या सर्वांनी सांगितले की भारतीय प्रशिक्षक कधीकधी खेळाडूंबद्दल पक्षपाती असतात. काहीजण फेव्हरेटिजम करतात आणि जे नाहीत त्यांना संघाच्या बाहेर कसे जातील अशी व्यवस्था करतात. त्यामुळे जेव्हा एखादा परदेशी प्रशिक्षक येतो तेव्हा तो सर्व खेळाडूंकडे एकाच नजरेने पाहतो. एखाद्या परदेशी प्रशिक्षकालाही तेंडुलकर, द्रविड, गांगुली किंवा लक्ष्मण यांच्याशी बोलताना, वागताना दबाव जाणवू शकतो.” असेही सेहवाग पुढे म्हणाला.

सेहवाग भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत पाहिलेल्या दोन सर्वात यशस्वी परदेशी प्रशिक्षकांच्या हाताखाली खेळला ते म्हणजे ‘जॉन राइट आणि गॅरी कर्स्टन’. राइटच्या नेतृत्वाखाली, सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक अडचणींना तोंड देत स्वतःला शोधले तर कर्स्टनच्या देखरेखीखाली सिद्ध करत त्याने विश्वचषक जिंकला. २००० ते २००५ या कालावधीत जॉन राईट प्रभारी असताना, सेहवागला कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही सामन्यांमध्ये सलामी देण्यासाठी पदोन्नती देण्यात आली आणि त्याने पाकिस्तानविरुद्ध मुलतान येथे प्रसिद्ध २०९ धावा केल्या. मध्येच सेहवाग ग्रेग चॅपलच्या हाताखाली खेळला पण तिथे त्याच्यासोबत काय झाले हे जगाला माहीत आहे. या तिघांपैकी, सेहवागने कर्स्टनला आपला सर्वोत्तम म्हटले आहे, ज्यांच्याकडे क्रिकेटर म्हणून खूप काही शिकण्यासारखे आहे.

हेही वाचा: IPL 2023: अनिल जयसिंघानीच्या अटकेनंतर BCCI हायअलर्टवर, मॅच फिक्सिंगच्या भीतीने खेळाडूंना सावध राहण्याचा सल्ला

“मला वाटते की भारतीय संघाला कोचिंगची गरज नाही; त्याला एक मॅनेजर हवा आहे जो स्ट्राइक करू शकेल आणि सर्व खेळाडूंशी मैत्री करू मार्गदर्शन करेल. प्रशिक्षकाला माहित असले पाहिजे की कोणत्या खेळाडूला किती सरावाची गरज आहे आणि गॅरी कर्स्टन हे या बाबतीत निष्णात होते. मी फक्त ५० चेंडू खेळतो, द्रविड २००, सचिन २०० आणि असे बरेच काही. त्यानंतर, ते आम्हाला ब्रेक देतील. हे एक मी उदाहरण सांगत आहे.” असे भारताचे माजी सलामीवीर पुढे म्हणाले.