Wasim Akram on Virat, Rohit and KL Rahul: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ आता मालिकेत १-१ने बरोबरीत आहेत. टीम इंडियासाठी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील पराभव हे दुःस्वप्न ठरले असेल. दोहामध्ये लिजेंड्स लीग क्रिकेट खेळले जात आहे आणि त्यादरम्यान स्पोर्ट्स टुडेने पाकिस्तानचा माजी कर्णधार वेगवान गोलंदाज वसीम अक्रमशी संवाद साधला. त्यात त्याने रोहित शर्मा आणि केएल राहुल बाबतीत मोठे विधान केले आहे.

जेव्हा वसीम अक्रमला विचारण्यात आले की, टीम इंडियाचे फलंदाज अनेकदा डाव्या हाताच्या गोलंदाजांसमोर अडचणीत आले आहेत, तेव्हा तुम्हाला काय वाटते? याला प्रत्युत्तर देताना वसीम अक्रमने टीम इंडियाच्या खेळाडूंबद्दल सांगितले की, “टीम इंडियाकडे महान फलंदाज आहेत, मग तुम्ही विराट कोहली घ्या किंवा रोहित शर्मा, ते सर्वजण शानदार फलंदाजी करतात, पण होय, डावखुरा गोलंदाजांचा गोलंदाजीचा कोण नक्कीच त्रास देतो. रोहित आणि विराट सारख्या फलंदाजांमध्ये ही क्षमता आहे आणि त्यांना डाव्या हाताच्या गोलंदाजाचा सामना कसा करायचा हे माहित आहे.”

हेही वाचा: IPL 2023: “वर्ल्डकप आणि WTC Final साठी…”, IPL फ्रँचायझी बाबतीतील रवी शास्त्रींची विनंती BCCI मान्य करणार का?

वसीम अक्रम पुढे म्हणाला की, “ भारतीय फलंदाजांना डावखुऱ्या गोलंदाजासमोर फलंदाजी तंत्रात थोडे बदल करणे गरजेचे आहे. जिथे चेंडू स्विंग होतो तिथे तुम्हाला स्टान्स हा वेगळा ठेवावा लागतो. तसेच गोलंदाजाच्या हाताकडे अधिक लक्ष असणे गरजेचे आहे. नेहमीच अंदाज खरे निघतील असे नाही पण कधीकधी त्याची मदत होते. नॉन स्ट्रायकरला असणाऱ्या फलंदाजाने इशारा करून कधी बॅटने इशारा करून इनस्विंग आणि आउट स्विंगसाठी मदत करावी यातून बराच फायदा होतो.”

पुढे अक्रम म्हणाला, “बघा, विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल; ते सर्व महान खेळाडू आहेत. राहुलने भारतासाठी पहिली वनडे जिंकली. कोहली, राहुल आणि रोहित हेच डावखुऱ्या गोलंदाजाच्या जाळ्यात येतात असे नाही, जगातील इतर फलंदाजही त्याच्या सापळ्यातून स्वत:ला वाचवू शकले नाहीत. विशाखापट्टणममधली खेळपट्टी पाहून ऑस्ट्रेलियातला सामना पाहावासा वाटला. पाऊस पडला होता आणि मैदानही हिरवेगार होते. हा सामना न्यूझीलंडमध्ये खेळला जात असल्याचा भास झाला. मी आयोजकांना श्रेय देऊ इच्छितो की त्यांनी इतके चांगले मैदान तयार केले.”

हेही वाचा: KL Rahul: “काहींना काड्या घालण्याची…”, केएल राहुलच्या टीकेवरून गंभीरने नाव न घेता व्यंकटेश प्रसादला मारला टोमणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हा एक छोटासा सामना होता; पण ऑस्ट्रेलियाने चांगला खेळ केला. एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत आहे, त्यामुळे अंतिम एकदिवसीय सामना खूपच रोमांचक असेल. पण विशाखापट्टणमच्या विकेटवर बॉल सीम होत असल्याचं मला जाणवलं. ऑस्ट्रेलियाने झटपट धावा केल्या, तरी मी मोहम्मद सिराजची काही षटके पाहिली, चेंडू दोन्ही बाजूंनी शिवत होता. मी भारतीय क्रिकेटला नियमितपणे फॉलो करत नाही, पण मी म्हटल्याप्रमाणे, टीम इंडियाकडे काही उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि त्यांना कसे जुळवून घ्यावे हे माहित आहे. गोलंदाजांनाही काही दिवस असतात; मिचेल स्टार्कचे खूप चांगले गोलंदाजी केल्याबद्दल अभिनंदन. स्टार्क हा महान गोलंदाज आहे यात शंका नाही, तो जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. तर हा त्याचा दिवस होता.” असेही तो पुढे म्हणाला.