Ashish Nehra on Rinku Singh: माजी भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराच्या मते, डावखुरा विस्फोटक फलंदाज रिंकू सिंग भारताच्या टी-२० विश्वचषक संघात ‘फिनिशर’ म्हणून आपली भूमिका निभावू शकतो. मात्र, या जागेसाठी त्याला सहकारी खेळाडूंकडून कडवे आव्हान पेलावे लागेल, असे मत नेहराने व्यक्त केले. पुढील वर्षी जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात रिंकूने २९ चेंडूत ४६ धावांची खेळी केली.

नेहरा म्हणाला, “भारताच्या टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत रिंकू प्रमुख दावेदार खेळाडूंपैकी एक आहे, यात शंका नाही. पण विश्वचषक अजून खूप दूर आहे आणि तो ज्या स्थानावर खेळणार आहे, त्या जागी अनेक इतर मोठे खेळाडू आहेत. त्यासाठी त्याला हार्दिक पंड्यासह अनेक खेळाडूंना मागे टाकावे लागेल. तो अजून नवीन असून त्याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका होती. रिंकूने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत काही चांगल्या खेळी खेळल्या, त्यात तिरुअनंतपुरममधील दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील ९ चेंडूत ३१ धावांच्या खेळीचा समावेश आहे. त्याच्या या आक्रमक फलंदाजीमुळे भारताने तो सामना ४४ धावांच्या फरकाने जिंकला.

batsman jemima rodrigues on t20 world cup
जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी परिस्थितीनुसार खेळणे आवश्यक! ट्वेन्टी२० विश्वचषकाबाबत जेमिमाचे मत
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Sanjay Manjrekar on Mohammed Shami for Border Gavaskar Trophy
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी मोहम्मद शमी फिट नसेल तर ‘हा’ गोलंदाज उत्तम पर्याय; संजय मांजरेकरांचं वक्तव्य
Try to keep him in his crease says Nathan Lyon on Rishabh Pant
‘…षटकारांची भीती वाटत नाही’, ऋषभ पंतबद्दल बोलताना नॅथन लॉयन काय म्हणाला?
Australian captain Pat Cummins statement regarding Rishabh Pant
पंतला रोखणे आवश्यक -कमिन्स
Harmanpreet Kaur believes in winning the ICC World Cup cricket tournament sport news
विश्वविजेतेपदाची सर्वोत्तम संधी! ऑस्ट्रेलियालाही टक्कर देण्याचा महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीतला विश्वास
Virat Kohli Naagin Dance Video Viral He Mocks Bangladesh with Snake Pose in IND vs BAN
VIDEO: विराट कोहलीचा फिल्डिंग करतानाचा नागिन डान्स व्हायरल, बांगलादेशला त्यांच्याच स्टाईलमध्ये चिडवलं?
IND vs BAN Team India squad announced for 2nd test match
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर! कोणत्या खेळाडूंना मिळाली संधी? जाणून घ्या

रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा भाग असतील की नाही याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही, त्यामुळे संघात अनेक मोठे बदल होऊ शकतात. रिंकू सिंह हा ‘स्लॉग ओव्हर’चा प्रबळ दावेदार असू शकतो. माजी भारतीय वेगवान गोलंदाज नेहरा पुढे म्हणाला, “तुम्ही जितेश शर्मा (यष्टीरक्षक फलंदाज) आणि तिलक वर्मा यांनाही विश्वचषक २०२४मध्ये पाहू शकता. मात्र, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या कोणत्या पदांवर खेळणार याबाबतची चर्चा संघ व्यवस्थापनाला करावी लागणार आहे.”

हेही वाचा: Shubman Gill: २०२३ गिलसाठी ‘शुभ’वर्ष! ‘स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर’च्या पुरस्काराने केले सन्मानित

नेहरा पुढे म्हणाला, ‘१५ सदस्यीय संघात किती जागा उपलब्ध आहेत हे पाहावे लागेल. पण एक गोष्ट म्हणजे रिंकूने सगळ्यांवरच दडपण आणलंय. मात्र, विश्वचषकाला अजून बराच अवधी शिल्लक आहे. त्याआधी दक्षिण आफ्रिकेचा दौरा, अफगाणिस्तानविरुद्धची मालिका आणि आय.पी.एल आहे.”

पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिका ४-१ने जिंकली. त्यांनी विशाखापट्टणममध्ये दोन गडी राखून आणि तिरुवनंतपुरममध्ये ४४ धावांनी विजय मिळवला होता. यानंतर गुवाहाटीमध्ये ऑस्ट्रेलियाने मालिकेत टीम इंडियाला आव्हान देत पाच गडी राखून सामना जिंकला. मात्र, भारताने दमदार पुनरागमन करत शेवटचे दोन सामने जिंकले. रायपूरमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाचा २० धावांनी आणि आता बंगळुरूमध्ये सहा धावांनी पराभव केला.

हेही वाचा: World Cup: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शानदार कामगिरीनंतरही अक्षर पटेल नाराज; म्हणाला, “विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर मी…”

टी-२० मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा १९व्यांदा पराभव केला आहे. भारताचा हा एकाच संघाविरुद्धचा संयुक्त सर्वोच्च विजय आहे. श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या दोन संघांमध्ये झालेल्या टी-२० मालिकेत १९-१९ असा विजय मिळवला आहे. एका संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. त्यांनी २० वेळा न्यूझीलंडचा पराभव केला आहे.