Mumbai Indians Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरच्या १० चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने केलेल्या ९५ धावांच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गमावलेला सामना जिंकला. महिला प्रीमियर लीगच्या महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला गुजरात जायंट्सविरुद्ध विजयासाठी शेवटच्या ५ षटकांत ७२ धावांची गरज होती आणि कर्णधार हरमनप्रीत कौर २७ चेंडूत ३९ धावांवर करत खेळत होती, तर एमिलिया २ चेंडूत २ धाव घेत तिच्यासोबत मैदानात होती. पण हरमनने अचानक आपला गियर बदलत एकामागून एक चेंडू थेट सीमारेषेबाहेर धाडले, कधी चौकार तर कधी षटकार… आणि बघता बघता एक चेंडू राखून मुंबईच्या संघाने दिमाखदार विजय मिळवला.

हरमनप्रीतची विस्फोटक खेळी पाहून सगळेच चकित होत होते. तिच्या बॅटला स्प्रिंग लावली आहे की काय असंच जणू वाटतं होतं. सामना संपल्यानंतर हरमनने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की खुद्द पंचांनी विजयानंतर त्याची बॅट तपासली. सामना संपल्यानंतर समालोचकही याबद्दल बोलत होते. सामन्यानंतर बोलताना कौरने सांगितले की, ही तिची सरावाची बॅट आहे. ती ज्या बॅटने खेळत होती. त्याची पकड थोडी सैल होत होती. त्यामुळे त्याने सरावाची बॅट वापरण्याचा निर्णय घेतला आणि तिने बॅट मागवून घेतल्यानंतर जे घडलं ते साऱ्या जगाने पाहिलं. हरमनप्रीत कौरने शेवटच्या २७ चेंडूत तब्बल ७५ धावा केल्या.

Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Match Updates in Marathi
KKR vs LSG : कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठी लखनऊच्या संघाने जर्सीचा रंग का बदलला? जाणून घ्या
Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
Sunil Gavaskar's reaction to Surya
MI vs RR : मुंबईला पराभवाच्या हॅट्ट्रिकनंतर ‘या’ गेम चेंजरची भासत आहे उणीव, माजी दिग्गज सुनील गावसकरांचे वक्तव्य

प्रथम फलंदाजी करताना गुजरात जायंट्सने ७ गड्यांच्या मोबदल्यात १९० धावा केल्या. बेथ मुनीने ३५ चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या, तर हेमलताने ४० चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ७४ धावा केल्या. अखेरच्या सामन्यात भारती फुलमणीने १३ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद २१ धावा केल्या. मुंबई संघाने ८ गोलंदाज बदलले, मात्र धावांचा प्रवाह रोखण्यात अपयश आले. एका क्षणाला तर धावसंख्या सहज २०० चा टप्पा गाठेल असे वाटले होते, पण मुंबईच्या गोलंदाजांना सूर गवसला.

प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने दमदार सुरुवात करत हेली मॅथ्यूजने १८ धावा आणि यास्तिका भाटियाने ४९ धावा केल्या. मात्र हेली मॅथ्यूज,नतालिया सीव्हर ब्रंट (२) आणि यास्तिका भाटिया यांच्या विकेट पडल्यानंतर मुंबई अडचणीत आल्याचे दिसत होते. पण संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने जबाबदारी सांभाळत सामना मुंबईच्या दिशेने वळवला. या विजयासह मुंबई इंडियन्स बाद फेरीसाठी पात्र ठरली आहे. त्यांच्या खात्यात आता १० गुण असून संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.