Mumbai Indians Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरच्या १० चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने केलेल्या ९५ धावांच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गमावलेला सामना जिंकला. महिला प्रीमियर लीगच्या महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला गुजरात जायंट्सविरुद्ध विजयासाठी शेवटच्या ५ षटकांत ७२ धावांची गरज होती आणि कर्णधार हरमनप्रीत कौर २७ चेंडूत ३९ धावांवर करत खेळत होती, तर एमिलिया २ चेंडूत २ धाव घेत तिच्यासोबत मैदानात होती. पण हरमनने अचानक आपला गियर बदलत एकामागून एक चेंडू थेट सीमारेषेबाहेर धाडले, कधी चौकार तर कधी षटकार… आणि बघता बघता एक चेंडू राखून मुंबईच्या संघाने दिमाखदार विजय मिळवला.

हरमनप्रीतची विस्फोटक खेळी पाहून सगळेच चकित होत होते. तिच्या बॅटला स्प्रिंग लावली आहे की काय असंच जणू वाटतं होतं. सामना संपल्यानंतर हरमनने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की खुद्द पंचांनी विजयानंतर त्याची बॅट तपासली. सामना संपल्यानंतर समालोचकही याबद्दल बोलत होते. सामन्यानंतर बोलताना कौरने सांगितले की, ही तिची सरावाची बॅट आहे. ती ज्या बॅटने खेळत होती. त्याची पकड थोडी सैल होत होती. त्यामुळे त्याने सरावाची बॅट वापरण्याचा निर्णय घेतला आणि तिने बॅट मागवून घेतल्यानंतर जे घडलं ते साऱ्या जगाने पाहिलं. हरमनप्रीत कौरने शेवटच्या २७ चेंडूत तब्बल ७५ धावा केल्या.

Confusion at the Argentina Morocco football match in the Olympics sport new
चाहत्यांची घुसखोरी, सामना स्थगित अन् निर्णायक गोल रद्द! ऑलिम्पिकमधील अर्जेंटिना-मोरोक्को फुटबॉल सामन्यात गोंधळ
Controversy over Arvind Yadav appointment in archery team sport
तिरंदाजी संघात यादव यांच्या नियुक्तीवरून नवा वाद; ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर संघटनेमध्येच आरोपप्रत्यारोप
Team India T20 Captain Suryakumar Yadav
Suryakumar Yadav : ‘माझ्यासाठी गोष्टी सोप्या ठेवणे महत्त्वाचे…’, टी-२० संघाचा कर्णधार बनताच सूर्याचा जुना VIDEO व्हायरल
Shashi Tharoor criticizes BCCI
IND vs SL : टीम इंडियाच्या निवडीवर शशी थरुर संतापले; म्हणाले, ‘ज्यांनी शतकं झळकावली त्यांनाच…’
Deshpande T20 International Debut
IND vs ZIM 4th T20 : मुंबईचा मुलगा, धोनीचा शिष्य, कोण आहे तुषार देशपांडे? ज्याने टीम इंडियासाठी केले पदार्पण
The procession of the Twenty20 World Cup winning Indian cricket team was organized in Mumbai sport
दिग्विजयाचा आज मुंबईत जल्लोष; ट्वेन्टी२० विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या मिरवणुकीचे आयोजन
Sreesanth Slams Riyan Parag For Not Supporting India In T20 World Cup 2024
“आधी देशभक्त हो…”, रियान परागच्या वादग्रस्त वक्तव्यावर श्रीसंत संतापला; पण नेमकं काय घडलं?
Rishabh Pant 'Casually' Does A Dhoni; Stumps Moeen Ali Nonchalantly Off Axar
IND vs ENG : ऋषभ पंतच्या चपळाईने चाहत्यांना झाली धोनीची आठवण, मोईन अलीच्या स्टंपिगचा VIDEO व्हायरल

प्रथम फलंदाजी करताना गुजरात जायंट्सने ७ गड्यांच्या मोबदल्यात १९० धावा केल्या. बेथ मुनीने ३५ चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या, तर हेमलताने ४० चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ७४ धावा केल्या. अखेरच्या सामन्यात भारती फुलमणीने १३ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद २१ धावा केल्या. मुंबई संघाने ८ गोलंदाज बदलले, मात्र धावांचा प्रवाह रोखण्यात अपयश आले. एका क्षणाला तर धावसंख्या सहज २०० चा टप्पा गाठेल असे वाटले होते, पण मुंबईच्या गोलंदाजांना सूर गवसला.

प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने दमदार सुरुवात करत हेली मॅथ्यूजने १८ धावा आणि यास्तिका भाटियाने ४९ धावा केल्या. मात्र हेली मॅथ्यूज,नतालिया सीव्हर ब्रंट (२) आणि यास्तिका भाटिया यांच्या विकेट पडल्यानंतर मुंबई अडचणीत आल्याचे दिसत होते. पण संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने जबाबदारी सांभाळत सामना मुंबईच्या दिशेने वळवला. या विजयासह मुंबई इंडियन्स बाद फेरीसाठी पात्र ठरली आहे. त्यांच्या खात्यात आता १० गुण असून संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.