scorecardresearch

Premium

WTC 2023 Final: ऑस्ट्रेलियाला घाम फोडणाऱ्या रहाणेने धोनीला दिले श्रेय; म्हणाला, “खेळ अजून संपला नाही…”

India vs Australia, WTC 2023 Final: अजिंक्य रहाणेने सामन्यानंतर सौरव गांगुलीला सांगितले की टीम इंडियाला किती धावांचा पाठलाग करू शकते. तसेच त्याने त्याच्या खेळीचे श्रेय धोनीला दिले.

WTC 2023: Dhoni's team changed Rahane's fortunes Revealed after tremendous comeback Ganguly's question answered
तिसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यावर गांगुलीशी बोलताना अजिंक्य रहाणेने शानदार कामगिरीचे श्रेय एम.एस. धोनीला दिले. सौजन्य- हॉटस्टार (ट्वीटर)

WTC 2023 Final India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२३मध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व कायम आहे. तीन दिवसांच्या खेळानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडे २९६ धावांची आघाडी आहे. टीम इंडिया तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात २९६ धावांवर ऑलआऊट झाली. यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ४ बाद १२३ धावा केल्या होत्या. टीम इंडिया अजूनही या सामन्यात आहे, त्यामुळे १८ वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेला श्रेय जाते. त्याने ८९ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली.

अजिंक्य रहाणेने श्रेय एम.एस. धोनीला दिले फलंदाजीचे श्रेय

तिसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यावर अजिंक्य रहाणेने शानदार कामगिरीचे श्रेय एम.एस. धोनीला दिले. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने जेव्हा त्याला विचारले की यात चेन्नई सुपर किंग्जचा प्रभाव आहे का? यावर तो म्हणाला, “हो नक्कीच. मी CSK मध्ये खूप मजा केली. माझ्या चांगल्या कामगिरीचे श्रेय धोनीला जाते. त्याने मला CSK कडून खेळण्याची संधी दिली ज्यामुळे माझा आत्मविश्वास परत आला.” तो म्हणाला, “माझ्या फलंदाजीत धोनीमुळे आत्मविश्वास आला त्याने मला खूप मदत केली. धोनीने मला सीएसकेकडून खेळण्याची संधी दिली ज्यामुळे मी अधिक समृद्ध झालो.”

Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…

अजिंक्य रहाणेने प्रथम रवींद्र जडेजासोबत ७१ धावांची भागीदारी केली, त्यानंतर शार्दुल ठाकूरसोबत १०९ धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. या खेळीनंतर रहाणेचे मनोबल खूप उंचावले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी त्याला विचारले की, टीम इंडिया किती पाठलाग करण्याचा विचार करत आहे. यावर रहाणे म्हणाला की, “ऑस्ट्रेलिया जेवढ्या धावा करेल तेवढ्या आम्ही करू.”

आपण किती पाठलाग करू शकता

स्टार स्पोर्ट्सवरील तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुलीने रहाणेला विचारले की तो किती पाठलाग करू शकेल? यावर त्याने उत्तर दिले, “जेवढे ऑस्ट्रेलियन खेळाडू आमच्यासमोर ठेवतील तेवढे करू.” दादासोबत उपस्थित हरभजन सिंग म्हणाला, “ये हुई ना बात.” रहाणे सुरुवातीला म्हणाला, “पाहा, आम्ही चांगले पुनरागमन केले आहे. या क्षणी ऑस्ट्रेलिया नक्कीच आमच्या पुढे आहे, परंतु आम्ही कसोटी सामन्यांमध्ये पाहिले आहे की जर तुमचा दिवस चांगला असेल, चांगले सत्र असेल तर तुम्ही पुनरागमन करू शकता.”

खेळ अजून संपलेला नाही-रहाणे

रहाणे पुढे म्हणाला, “खेळ अजून संपलेला नाही. जेव्हा तुम्ही मागे असता तेव्हा तुमच्यासाठी हे नेहमीच आव्हान असते की तुम्ही किती त्यातून कसे बाहेर येतात, संघासाठी चांगली कामगिरी करण्यासाठी तुम्ही किती प्रेरित आहात हे यातून कळते. जर संपूर्ण कसोटी सामन्यात किंवा संपूर्ण सत्रावर आपले वर्चस्व असेल तर ते सोपे आहे. खेळात जेव्हा मागे असतो तेव्हा हे थोडेसे अवघड असते आणि तिथून जो कामगिरी करतो तोच पुढे जातो. आम्ही नक्कीच मागे आहोत, पण चांगली भागीदारी किंवा चांगली खेळी खेळाला कलाटणी देऊ शकते, अशी चर्चा आमच्या ड्रेसिंगमध्ये होती. आपण मागे असाल तरीही आपण पुनरागमन करू शकता हे आम्ही यापूर्वी पाहिले आहे.”

हेही वाचा: WTC 2023 Final: पॅट कमिन्सचे अंगावर येणारे चेंडू रोखण्यासाठी शार्दुलचा अनोखा जुगाड! हे पाहून पाँटिंग म्हणाला, “हे असं कधीच पाहिलं…”

सौरव गांगुलीचा प्रश्न

सौरव गांगुलीने त्याला प्रश्न केला आणि म्हणाला, “ऑस्ट्रेलियातही तुझी अशीच परिस्थिती होती, जेव्हा तू ब्रिस्बेनमध्ये शेवटची कसोटी जिंकली होतीस आणि तू तिथे कर्णधारही होतास. शेवटच्या दिवशी तुम्हाला ३५० धावा करायच्या होत्या. तुम्ही ही कसोटी मालिका जिंकली. एक वरिष्ठ खेळाडू म्हणून जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना काय म्हणाल?”

हेही वाचा: WTC 2023 Final: ‘व्हॉईस ऑफ फुटबॉल’ भेटला ‘व्हॉइस ऑफ क्रिकेट’, हर्षा भोगलेनी शेअर केला ड्र्युरींसोबतचा फोटो

अजिंक्य रहाणेचे उत्तर

उत्तर देताना रहाणे म्हणाला, “अशा परिस्थितीत तुम्ही गोष्टी सोप्या करायला पाहिजेत, जास्त विचार करू नका. आज आम्ही फलंदाजी सुरू केली तेव्हा किती वेळ खेळू शकतो हा गेम प्लॅन होता. कारण हे मैदान असे आहे की जिथे तुम्ही धावा थांबवू शकत नाही. जर तुम्ही फलंदाज म्हणून सेट झालात तर धावा येतच राहतील. सलामीचे फलंदाज लवकर बाद झाल्याने आमच्यासाठी भागीदारी खूप महत्त्वाची होती. आधी जड्डृ आणि नंतर शार्दुलबरोबर विश्वासार्ह भागीदारी झाली, ती आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wtc final 2023 ajinkya rahanes interesting statement regarding target chasing replied to sourav ganguly avw

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×