बाळंतपण हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. बाळंतपणादरम्यान आणि नंतर शरीरात असंख्य बदल होत असतात. बाळंतपणामध्ये अनेकदा महिलांचे वजन मोठ्या प्रमाणात वाढते. बाळाला जन्म दिल्यानंतर काही महिलांचे वजन हळू हळू कमी होते तर काहींचे वजन अजिबात कमी होत नाही.

अभिनेत्री गौहर खान हिने मुलाला जन्म दिल्यानंतरचे वजन खूप वाढले होते जे कमी काळात कमी करून तिने सर्वांना थक्क केले आहे. गौहरने फक्त १० दिवसांमध्ये १० किलो वजन कमी केले. बाळपणांनंतर काही महिन्यातच ही झलक दिखला जा ११ च्या सेटवर होस्ट म्हणून पुन्हा दिसली. गौहरने वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सर्वांना माहिती दिली आणि लाईफस्टाईलसह तिच्या जीवनशैलीत काही बदल केले ज्यामुळे वजन कमी करणे शक्य आहे असे सांगितले.

गौहरने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत सांगितले की, मुलाला जन्म दिल्यानंतर १० दिवसात तिने १० किलो वजन कमी झाले. द देबीना बॅनर्जी हिचा शोदरम्यान गप्पा मारताना गौहरने याबाबत खुलासा केला. तिने सांगितले की, तिने वजन कमी करावे लागले कारण ही एक पब्लिक फिगर असल्याची जबाबदारी आहे. तिने पूर्ण पण डाएटमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.

स्तनपानच्या काळात ती आपल्या आहाराबाबतच्या नियमांमध्ये थोडी सुट देत असे कारण तिला बाळाच्या आरोग्य आणि विकासाला प्राधान्य द्यायचे होते. स्तनपानाच्या काळात तिने आपल्या बाळाच्या आरोग्य आणि विकासासाठी कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्सचे सेवन केले.

गौहर खान आपल्या मुलाला ६ महिने पूर्ण झाल्यानंतर आणि स्तनपान बंद केल्यानंतर एक मर्यादीत आहाराची योजना स्विकारली. या काळात तीन केवळ सॅलड आणि सूपचे सेवन केले गौहर खानने सांगितले की, ती दिवसातून तीनवेळा जेवत असे पण त्यामध्ये फक्त सॅलड आणि सूप सामविष्ट होते. वजन कमी करण्यासाठी तिने आहारातून मांहारार आणि मटण सारख्या कॅलर्जीसारख्या गोष्टी काढून टाकल्या. गौहर खानने कबूल केले की, ही दिनचर्या तीने स्वत: तयार केली होते जी तिने संशोधन केल्यानंतर निवडल होते आणि त्यासाठी तिने तज्ज्ञांचा सल्ला घेतला नव्हता.

माझ्या आहारात फक्त पालेभाजी आणि सूपचा समावेश होता. मी माझ्या तोंडावर ताबा ठेवला होता आणि मी खरचं असे केले. मी काही खास डाएट करत नव्हते मी फक्त योग्य आहार घेत होते. पण सॅलड आणि सूपच्या स्वरुपात मी घात होते. मी मांसहार सोडला होता. मी मटण सोडले होते. ही माझा आवडता पदार्थ होता पण मी ते खाणे सोडले कारण त्यामध्ये खूप जास्त कॅलरीज होत्या.

काय म्हणतात तज्ज्ञ

हेल्थलाइनच्या मते, अभ्यासातून असे आढळून आले आहे की,”जे लोक सूप पितात त्यांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) कमी असतो आणि त्यांना लठ्ठपणा येण्याची शक्यता कमी असते. पण, आरोग्य तज्ज्ञ या आहाराची शिफारस करत नाहीत, कारण त्याचे दीर्घकाळात हानिकारक परिणाम होऊ शकतात.

कर्नाटकातील बेंगळुरू येथील यशवंतपूर येथील मणिपाल हॉस्पिटलमधील मुख्य आहारतज्ज्ञ पवित्रा एन राज यांच्या मते, “बाळंतपणानंतर नवीन आईमध्ये अनेक हार्मोनल बदल होतात. आहारातील बदलांचा रक्तदाब आणि साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. केस गळणे यासारख्या नवीन मातांना प्रभावित करणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी निरोगी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पोषक तत्वांचे मिश्रण खाणे महत्वाचे आहे.