पावसाळ्यात आणि एरवीही अनेक आजार हे दूषित पाण्यातून पसरतात. विशेषतः पावसाळ्यामध्ये घरात अशुद्ध पाणी येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कावीळ, कॉलरा, डायरिया असे आजार उद्भवू शकतात. हल्ली नोकरी, घर अशी धावपळ असल्याने बाजारात मिळणाऱ्या ब्रॅंडेड वॉटर प्युरीफायरचा पाणी शुद्ध करण्यासाठी वापर केला जातो. मात्र पूर्वी वापरले जाणारे पाणी स्वच्छ करण्याचे उपाय आजही तितकेच फायदेशीर ठरतात. तसेच यामुळे वीजेचीही बचत होते. तसेच ज्या ठिकाणी २४ तास पाणी उपलब्ध नसते त्यांच्यासाठी तर हे उपाय जास्तच फायदेशीर ठरतात. तेव्हा घरच्या घरी पाणी स्वच्छ करण्याच्या काही खास पद्धती…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. पाणी गाळून घेणे – वॉटर प्युरीफायरमध्ये पाणी गाळले जाते. त्याचप्रमाणे स्वच्छ कापड किंवा अतिशय बारीक जाळीची गाळणी यांनी पाणी गाळून घेतल्यास ते स्वच्छ होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या पद्धतीचा हमखास वापर करावा. मी चागंल्या सोसायटीमध्ये राहतो त्यामुळे आमच्याकडे चांगले पाणी येते असे वाटत असले तरीही पाणी कायम गाळून मगच प्यावे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best ways to purify water in monsoon and rainy season scsg
First published on: 02-07-2021 at 08:44 IST