मे महिना आणि आंबा असं समीकरणचं आहे. सध्या आंब्याचा सीजन आहे. बाजारात विविध प्रकारचे आंबे आले आहेत. अनेक जण आंबा म्हटलं की अगदी ताव मारतात. आंब्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक घटक असतात. रक्त गोठणे या समस्यांवर आंबा प्रभावी ठरतो. एवढेच नाही तर आपल्या शरीरातील हाडे मजबूत होण्यासही मदत होते. आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रक्तवाहिन्या आणि कोलेजनसाठीही फायदेशीर आहे. ज्यामुळे शरीरातील विविध समस्या लवकरात लवकर बऱ्या करणे सोपे होते. आंबे खाण्यापूर्वी पाण्यात टाकावेत हे आपण लहानपणापासून पाहत आणि ऐकत आलो आहोत. आंब्यावरील घाण साफ व्हावी किंवा आंबा थोडा थंड व्हावा यासाठी असे केले जात असावे असे अनेकांना वाटते. मात्र यामागे वैज्ञानिक कारण आहे.
आंबे खाण्यापूर्वी ते किमान तासभर पाण्यात भिजत ठेवले पाहिजेत, असा सल्ला आपल्याला आजी अनेकदा देत असते. असे करण्यामागचे वैज्ञानिक कारण असे आहे की शरीरात तयार होणारे अतिरिक्त फायटिक ऍसिड काढून टाकण्यास मदत होते. हे ऍसिड विविध फळे, भाज्यांमध्ये असतं जे अतिरिक्त उष्णता निर्माण करते जे शरीरासाठी चांगले नाही.
आंबे भिजवून खावेत की नाही?
आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे बहुतांश लोक बाजारातून आंबा खरेदी केल्यानंतर लगेचच फ्रीजमध्ये साठवून ठेवतात. तर आजही अनेकजण घरी आणल्यानंतर तासन्तास आंबे पाण्यात ठेवतात. अशा परिस्थितीत पौष्टिकतेने परिपूर्ण आंब्याची चव आणि फायदे मिळविण्यासाठी आंबा खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर तुम्हालाही या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की आंब्यामध्ये असलेले पोषण मिळवण्यासाठी तो नेहमी भिजवल्यानंतर खावा.
वजन कमी करण्यास फायदेशीर
आंबा वजन कमी करण्यासाठी देखील अनुकूल मानला जातो, कारण आंबा खाल्ल्याने चरबी वाढत नाही आणि ते कोलेस्ट्रॉल मुक्त आहे. आंब्यात विरघळणारे फायबर भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे आपले पोट जास्त काळ भरलेले राहते, त्यामुळे आपण कमी खातो.