scorecardresearch

Premium

मोबाईल नंबर फक्त १० अंकीच का असतो? जाणून घ्या इंटरेस्टिंग कारण

तुम्हाला माहित आहे का की आपल्या रोजच्या वापरातल्या मोबाईलचा नंबर फक्त १० अंकांचाच का असतो? आणि त्यामागचे नक्की कारण काय आहे?

calling number
मोबाईल नंबर (फोटो: Indian Express)

जेव्हा आपण कोणाला कॉल करतो, त्याआधी आपण नंबर तपासतो की तो नंबर १० अंकी आहे की नाही? चुकून तुम्ही ९ किंवा ११ अंकी नंबर डायल केला तर फोन वाजत लागतच नाही. तुम्हाला माहित आहे का मोबाईल नंबर फक्त १० अंकांचाच का असतो? आणि त्यामागचे कारण काय आहे? चला जाणून घेऊयात.

हे NNP मुळे घडते

सरकारची नॅशनल नंबरिंग स्कीम म्हणजेच NNP भारतात १० अंकी मोबाईल नंबर असण्यामागे आहे. जर मोबाईल नंबर एक अंकाचा असेल तर ० ते ९ पर्यंत फक्त १० वेगवेगळे नंबर बनवता येतात. त्यानंतर फक्त १० नंबर बनवले जातील आणि एकूण १० लोकच त्यांचा वापर करू शकतील. दुसरीकडे, २ अंकी मोबाइल क्रमांक असला तरीही ० ते ९९ पर्यंतचे फक्त १०० नंबर बनवता येतात आणि ते फक्त १०० लोक वापरू शकतील.

canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
donald trump
“डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय”, माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या ट्वीटनंतर खळबळ, नेमकं प्रकरण काय?
What Udaynidhi Stalin Said?
उदयनिधी स्टॅलिन यांचा भाजपाला सवाल, “हाच का तुमचा सनातन धर्म? राष्ट्रपती विधवा आहेत म्हणून..”

( हे ही वाचा: ‘या’ चार राशीच्या मुली मानल्या जातात खूप हुशार; करिअरमध्ये गाठतात उंची! )

देशाची लोकसंख्या हेही एक कारण

याचे दुसरे कारण म्हणजे भारताची लोकसंख्या. सध्या देशाची लोकसंख्या सुमारे १३० कोटी आहे. सम क्रमांक नऊचा मोबाईल क्रमांक वापरला असता, तर भविष्यात हा क्रमांक सर्व लोकांना देता येणार नाही. त्याच वेळी, जेव्हा १० अंकी मोबाइल नंबर बनविला जातो, तेव्हा गणनानुसार एक हजार कोटी वेगवेगळे नंबर बनवता येतात. त्यामुळेच भविष्यात नंबर्सची वाढती मागणी लक्षात घेऊन १० अंकी मोबाईल नंबर करण्यात आला.

( हे ही वाचा: ‘या’ आहेत कमी बजेटमध्ये ७६ Kmpl पर्यंत मायलेज देणाऱ्या वजनाने हलक्या स्टायलिश टॉप ३ स्कूटी! )

पूर्वी संख्या होती 9 अंकी

हे लक्षात घेण्यासारखे आहे की २००३ पर्यंत देशात फक्त ९ अंकी मोबाईल क्रमांक होते. पण वाढती लोकसंख्या पाहता ट्रायने त्यात १० अंकांचा नंबर सुरु केला आहे. त्याच वेळी, १५ जानेवारी २०२१ पासून, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने लँडलाइनवरून कॉल करताना नंबरसमोर शून्य ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. डायलिंग पद्धतीतील हा बदल दूरसंचार कंपन्यांना मोबाइल सेवांसाठी २५४.४ दशलक्ष अतिरिक्त क्रमांक तयार करण्यास अनुमती देईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-11-2021 at 16:41 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×