केंद्र आणि राज्य सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्टपासून कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे दर्शन घेऊन राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेला सुरुवात करणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे दिली.

यावेळी अशोक चव्हाण म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी नागरिकांना अनेक अश्वासने भाजप सरकारने दिली. ती पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याने ३१ ऑगस्टपासून ८ सप्टेंबर दरम्यान कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यात जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.