महाड तालुक्यातील तळीयेत दरड कोसळून तब्बल ३२ घरं दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप झाली. या दुर्घटनेत मालमत्तेच्या नुकसानीबरोबरच प्रचंड जीवितहानी झाली. दरडीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचं कामं काल सकाळपासून सुरू असून, अद्यापही अनेकांच्या आप्तस्वकीय बेपत्ता आहेत. काळीज पिळवटून टाकणारी घटना म्हणजे काळ बनून आलेल्या दरड दुर्घटनेनं अवघ्या १ वर्षाची सान्वी आणि ८ वर्षाच्या करणालाही सोडलं नाही. त्या दोघांच्या कुटुंबियांचा आक्रोश काळजाचं पाणीपाणी करत आहे.

महाड तालुक्यातील तळीयेत दरड कोसळून तब्बल ३२ घरं दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप झाली. या दुर्घटनेत मालमत्तेच्या नुकसानीबरोबरच प्रचंड जीवितहानी झाली. दरडीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचं कामं काल सकाळपासून सुरू असून, अद्यापही अनेकांच्या आप्तस्वकीय बेपत्ता आहेत. काळीज पिळवटून टाकणारी घटना म्हणजे काळ बनून आलेल्या दरड दुर्घटनेत अवघ्या १ वर्षाची सान्वी आणि ८ वर्षाच्या करण बळी ठरल्याची भीती आहे. त्यांच्या शोध घेतला जात असून, कुटुंबीयांचा आक्रोश सुरू आहे.

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प

अद्यापही ५२ लोकांचा शोध सुरू असून, युद्धपातळीवर कार्य केलं जात आहे. तळीये येथील दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी या आज (२४ जुलै) घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी मीडियाशीही संवाद साधला. तळीयेच्या दुर्घटनेत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या दुर्घटनेतील ५२ जण अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये ३५ महिला, १० मुलांचा समावेश आहेत. तसेच दहा वर्षाखालील दोन मुलंही या दुर्घटनेत बेपत्ता आहेत, असं त्या म्हणाल्या.

दुर्घटनेत बेपत्ता असलेल्यांची नावं- यादी वाचण्यासाठी क्लिक करा

एनडीआरएफच्या तीन पथकांच्या मदतीने मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. तसंच बेपत्ता ग्रामस्थांचाही शोध घेतला जात आहे, असं सांगतानाच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाखाची तर पंतप्रधान कार्यालयाकडून प्रत्येकी दोन लाखांची मदत देण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकार जखमीवर मोफत उपचार केले जाणार आहेत, असं चौधरी यांनी सांगितलं.

वेळेवर मदत मिळाली असती तर…

अतिवृष्टी झाल्याने गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास वरंध घाट परिसरातील तळये गावातील कोंडाळकर वाडीवर दरड कोसळली. ३५ पैकी ३२ घरं दगड व मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. तर दुसरीकडे पूरपरिस्थिती आणि संपर्क यंत्रणाच कोलमडलेली असल्यानं दुर्घटनास्थळी वेळेवर मदत पोहोचू शकली नाही. शुक्रवारी सकाळी पुराचे पाणी ओसरू लागल्यानंतर मदतकार्य सुरू झालं; पण तोपर्यंत अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली. वेळेत मदत मिळाली असती, तर अनेकांचे जीव वाचवता आले असते.