scorecardresearch

Premium

परभणीतील शेतकऱ्यांना पीकविम्याचे १६० कोटी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामातील पीकविम्यापोटी १६० कोटी ४१ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसांत विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामातील पीकविम्यापोटी १६० कोटी ४१ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसांत विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
मागील खरीप हंगामातील पीकविमा काढण्यासंदर्भात सरकारने जनजागृती केली. दुष्काळी स्थितीत जिल्ह्यातील २ लाख १५ हजार ६१२ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला. विमा कंपनीकडे ८ कोटी ५६ लाख रक्कम भरण्यात आली. सरकारने वेळोवेळी पीकविमा भरण्यास मुदतवाढ दिली. पीकविमा काढण्यापूर्वी शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास त्याची तातडीने भरपाई दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, पीकविम्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी हवालदील झाले हाते.
जिल्ह्यात एकूण लागवडयोग्य क्षेत्र ५ लाख ५९ हजार हेक्टर आहे. पकी केवळ १ लाख ४८ हजार ६७९ हेक्टरचा विमा काढण्यात आला. २३५ कोटी ८४ लाख संरक्षित रक्कमेचा विमा नोंदवण्यात आला. जिल्ह्यातील २ लाख १५ हजार ६१२ शेतकऱ्यांनी ८ कोटी ५६ लाख रक्कम भरली होती. यात ८४ हजार ६०७ सोयाबीन उत्पादकांनी तब्बल ४ कोटी ५४ लाख १८ हजार रुपये पीकविम्यासाठी भरले. १४ हजार ४०३ कापूसउत्पादक शेतकऱ्यांनी १ कोटी ७३ लाख ४९ हजार रुपये रक्कम भरली. धान पिकासाठी ३ हजार ४८८ शेतकऱ्यांनी ३४ लाख, ज्वारीसाठी ६ हजार ८२२ शेतकऱ्यांनी ११ लाख, बाजरीसाठी ५३८ शेतकऱ्यांनी ८२ हजार, तुरीसाठी १४ हजार ७७४ शेतकऱ्यांनी ३४ लाख, मूग पिकासाठी ६४ हजार ३०४ शेतकऱ्यांनी १ कोटी २९ लाख ३४ हजार रुपये, उडीद पिकासाठी २६ हजार ४४६ शेतकऱ्यांनी ४६ लाख ६३ हजार रुपये, सूर्यफुल पिकासाठी २३० शेतकऱ्यांनी ४५ हजार रुपये रक्कम भरली.

boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 160 cr of harvest insurance for farmer of parbhani

First published on: 17-05-2015 at 01:40 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×