लोकसत्ता, खास प्रतिनिधी
अलिबाग- रायगड जिल्ह्यात शुक्रवारी ३५२ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. तर ३८३ जण करोना मुक्त झाले. सात जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

सध्या ३ हजार ५०१ करोनाचे रुग्ण आहेत. तर ५ हजार ८५५ रुग्ण करोना मुक्त झाले आहे. तर २५६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकुण करोनाबाधितांची संख्या ९ हजार ६१२ वर पोहोचली आहे. ७८८ जणांचे तपास अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

yavatmal, Cows Die After Eating Stale Food, karykarta s Birthday Party, election Campaign Rally, pandharkawada taluka, yavatmal district, yavatmal news, maha vikas aghadi, lok sabha election, election campaign, sanjay deshmukh, marathi news, yavatmal news,
शिळे अन्न खाल्ल्याने सहा गायींचा मृत्यू, वाढदिवसाचे भोजन जनावरांच्या जीवावर बेतले; पांढरकवडा तालुक्यातील घटना
nashik, Unseasonal Rain, Damages Crops, 107 Villages, Nashik District, farmers, nashik Unseasonal Rain, 729 hecters, surgana, trimbakseshwar, baglan, peth, nashik, nashik news, unseasonal rain nashik
अवकाळीचा नाशिक जिल्ह्यातील ७२९ हेक्टरवरील पिकांना फटका
500 houses collapsed in two days due to unseasonal rain in Yavatmal woman died due to lightning
यवतमाळात अवकाळीने दाणदाण; दोन दिवसांत ५०० घरांची पडझड, वीज कोसळून महिलेचा मृत्यू, तिघे गंभीर
Accident Image
लातूरमध्ये लग्नघरावर शोककळा; लग्नपत्रिका वाटताना नवरदेवाचा अपघाती मृत्यू

जिल्ह्यात ३५२ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील १४५, पनवेल ग्रामिण मधील ३४, उरण मधील ३१, खालापूर २३, कर्जत ४, पेण ३९, अलिबाग ५७, मुरुड १४, रोहा २, श्रीवर्धन १, महाड १ पोलादपूर १ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत १, उरण २, खालापूर २, अलिबाग १, पोलादपूर १, अशा तब्बल ७ जणांचा येथे रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३८३ जण करोना मुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील ३२ हजार ३५२ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ५०१ करोना बाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ४३२, पनवेल ग्रामिण हद्दीतील ४८४, उरण मधील १७३, खालापूर २८४, कर्जत ११७, पेण ३८४, अलिबाग ३११,  मुरुड ५६, माणगाव ५५, तळा येथील २, रोहा ७०, सुधागड १, श्रीवर्धन ३५, म्हसळा ४८, महाड ४१, पोलादपूर मधील ८ करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ६१ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.