इस्त्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेकडे भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. हे यान चंद्रावर उतरण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. चांद्रयान-३ मोहिमेतील लँडर २३ तारखेला संध्याकाळी चंद्रावर उतरणार आहे. चांद्रयान-२ च्या अपयशानंतर इस्त्रो आता चांद्रयान-३ ची मोहीम यशस्वी होण्यापासून अवघं एक पाऊल दूर आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मिश्किल विधान केलं आहे. अजित पवारांच्या विधानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही हसू आवरलं नाही.

नेमकं काय घडलं?

खरं तर, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लागू केला आहे. यामुळे संपूर्ण देशातील शेतकरी वर्ग नाराज झाला आहे. महाराष्ट्रातील नाशिकसह विविध शहरांमध्ये शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात उतरले आहेत. या कांदा प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सह्याद्री अथितीगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी चांद्रयानबद्दल विचारलेल्या एका प्रश्नावर अजित पवारांनी हटके उत्तर दिलं आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही हसू आवरता आलं नाही.

हेही वाचा- “ही नामर्दानगी आहे”, बच्चू कडूंचा मोदी सरकारला घरचा आहेर; म्हणाले, “सत्ता टिकावी म्हणून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांद्रयानाबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार पत्रकाराला उद्देशून म्हणाले, “अरे आधी उतरू दे ना, एवढी घाई का करतोय.” या मिश्किल विधानानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. यावेळी चांद्रयान-३ मोहिमेवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “हे खूप मोठं यश आहे. उद्या चांद्रयान चंद्रावर यशस्वीपणे उतरेल. यानंतर आपण सर्वजण आनंद साजरा करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हे चांद्रयान-३ चं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे.”