देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यावर महाराष्ट्रातील विधानसभेचं बिगुल वाजतं. पण, २०२४ साली लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुकीची शक्यता आहे. याबाबत महाराष्ट्र भाजपाने पक्षाच्या नेतृत्वाला एक प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाचा भाजपा नेतृत्व विचार करत असून, यावर शिक्कामोर्तब झाल्यास लोकसभेबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका होतील. यासंदर्भात ‘द हिंदू’ने वृत्त दिलं आहे.

लोकसभा निवडणूक एप्रिल-मे २०२४ साली होणार आहेत. तर, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ऑक्टोबर २०२४ मध्ये अपेक्षित आहे. पण, राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे. यावर आता प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि बच्चू कडू यांनी भाष्य केलं आहे.

congress leader sonia gandhi choose rajya sabha fear of defeat polls says pm narendra modi
पराभवाच्या भीतीने सोनिया गांधी राज्यसभेवर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका
odisha assembly elections BJD chief Naveen Patnaik chosen to contest from two seats
ओडिशाचे मुख्यमंत्री दोन जागांवर लढवणार निवडणूक; काय आहेत डावपेच?
Jayant Chowdhury told the workers the reason
भाजपाशी हातमिळवणी करण्याचं जयंत चौधरींनी कार्यकर्त्यांना सांगितलं कारण; म्हणाले, “भारतरत्न हा…”
RSS claims of support to Congress in Lok Sabha elections
‘आरएसएस’चा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंब्याचा दावा, जाणून घ्या सविस्तर…

हेही वाचा : शरद पवारांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून राष्ट्रवादीने दादा भुसेंना घेरलं, शंभूराज देसाई आले मदतीला धावून; नेमकं काय घडलं?

“एकत्र होऊद्या नाहीतर, वेगळे होऊद्या मते तर लोकच देणार आहेत. पाकिस्तानची लोक थोडीच मतदान करणार आहेत,” अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी विधिमंडळाबाहेर एका प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

हेही वाचा : “२६ मार्चपर्यंत माफी मागावी, अन्यथा…”, संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपांवरून दादा भुसेंचा इशारा; शरद पवारांचाही केला उल्लेख!

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी गोंधळ घातला, याबद्दल विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “सत्ता नसली की शेतकरी आठवतो. सत्ता असली की धनाढ्य लोकांबरोबर यांची मैत्री होते. ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांना मदत भेटली पाहिजे, यात दुमत नाही. लवकर आणि चांगल्या पद्धतीने मदत दिली पाहिजे. परंतु, किती नाटक करणार, विरोधात असल्यावर शेतकरी आठवला, सत्तेत होता तेव्हा दादांना शेतकरी आठवला नाही,” असा टोला बच्चू कडूंनी अजित पवारांना लगावला.