२०२२ साली राज्यातील राजकारणात मोठा भूकंप घडला. एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली. यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. सूरत-गुवाहाटी-गोवा असा प्रवास करून शिंदे गटानं भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. सत्तेत आल्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी अजित पवार यांनी निधी देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप केला होता. पण, अजित पवार शिंदे-भाजपा सरकारच्या सत्तेत सहभागी झाले आहेत.

आता शिंदे गटातील काहीजण उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पण, भविष्यात उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाणार का? यावर महाडचे आमदार भरत गोगावले यांनी भाष्य केलं आहे. ते ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्ट्या’वर बोलत होते.

हेही वाचा : “छगन भुजबळ वयाने मोठे, अन्यथा…”, शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेनंतर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

भरत गोगावले म्हणाले, “याबद्दल आजच सांगू शकत नाही. राजकारण आणि खेळात काय घडेल, हे सांगता येत नाही. एकनाथ शिंदे यांचा स्वभाव फार वेगळा आहे. एकनाथ शिंदे कुणाला अडचणीत टाकत नाहीत. कुठल्याही प्रसंगात असल्यावर एकनाथ शिंदे यांच्याकडे मदत मागितली, तर ते मदत करणारच.”

हेही वाचा : ९ आमदारांना मंत्रिपद मिळाल्यानं अन्याय झाला? सरकारमध्ये राष्ट्रवादीला घेण्याची गरज नव्हती? भरत गोगावले म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरेंकडून ‘मातोश्री’ची दारे तुमच्यासाठी उघडी असतील का? या प्रश्नावर भरत गोगावलेंनी म्हटलं, “शरद पवार यांच्याबद्दल बाळासाहेब काय बोलायचे, हे सर्वांना माहिती. पण, नंतर समीकरण बदलली. त्यामुळे राजकारणात काय घडेल, हे आज सांगू शकत नाही.”