सध्या राज्यात तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालीला सुरूवात झाली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे गटातील अनेक आमदारांची नावे चर्चेत आहेत. पण, दोन्ही मंत्रिमंडळ विस्तारात महाडचे आमदार भरत गोगावले यांची संधी हुकली आहे. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून आलेल्या ९ आमदारांना मंत्रीपदाची लॉटरी लागली. त्यामुळे भरत गोगावलेंवर अन्याय झाल्याची चर्चा रंगलेली. यावर भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊ नये हे आमचं आणि भाजपाच्या आमदारांचं मत झालं. पण, पुढच्या राजकारणासाठी टाकलेल्या डावातून हे सर्व घडलं आहे,” असं भरत गोगावले यांनी सांगितलं. ते ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्टावर’ बोलत होते.

What Jitendra Awhad Said About Ajit Pawar?
“अजित पवारांना भाजपाकडून बाजूला केलं जातं आहे, रोज..”; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
keshav upadhye replied to anil deshmukh allegation
“माजी गृहमंत्र्याचा अभ्यास कायद्याचा नसून केवळ १०० कोटींच्या वसुलीचा, त्यामुळे…”; अनिल देशमुखांच्या ‘त्या’ आरोपाला भाजपाचं प्रत्युत्तर!
Sharad Pawar
“चार महिने द्या, मला राज्य सरकार बदलायचंय”, शेतकऱ्यांसमोर शरद पवारांनी ठोकला शड्डू, म्हणाले…
mla s from shiv sena shinde faction complaints bjp and ncp leaders for not work in lok sabha elections
भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काम करण्यास टाळाटाळ ; शिवसेना आमदारांचा मुख्यमंत्र्यांपुढे तक्रारींचा पाढा; फडणवीस, पवारांशी चर्चा करण्याचे आश्वासन
Clarify stand on Jitendra Awhads plea to consolidate all offences High Court orders govt
श्रीरामाबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य : सर्व गुन्हे एकत्र करणाच्या आव्हाडांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश
Raksha Khadse and Eknath Khadse
Narendra Modi Swearing-in Ceremony Updates : सुनेला मंत्रिपदाची संधी मिळाल्यावर सासऱ्यांचे डोळे पाणावले; रक्षा खडसेंना आमंत्रण आल्यावर एकनाथ खडसे म्हणाले…
Jitendra Awhad Burns Manusmriti
जितेंद्र आव्हाडांकडून महाडच्या चवदार तळ्यावर ‘मनुस्मृती’चं दहन, अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करत म्हणाले…
BJP leaders of Nagpur are angry with Sanjay Raut accusation Nagpur
संजय राऊत यांच्या आरोपाने नागपूरचे भाजप नेते संतप्त; मला कोणाकडून रसद घेण्याची गरज नाही-विकास ठाकरे

हेही वाचा : तटकरे आणि गोगावले सूर जुळणे अशक्यच

भरत गोगावले म्हणाले, “शिवरायांच्या विचाराने चालणारा मी कार्यकर्ता आहे. ‘लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे’, त्याप्रमाणे आम्हाला जाणीव झाली की, एकनाथ शिंदे अडचणीत आले, तर आमच्या आमदारकीचा उपयोग काय? अशा काही घटना घडतात की, त्या अजरामर होतात. राजकारणात आमची नोंद होऊ शकते.”

हेही वाचा : शिंदे गटाचे भरत गोगावले यांची राष्ट्रवादीकडून कोंडी

राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना मंत्रिपद मिळाल्यानं अन्याय झाला? सरकारमध्ये राष्ट्रवादीला घेण्याची गरज नव्हती? असे प्रश्न विचारल्यावर भरत गोगावलेंनी म्हटलं, “हे आमचं आणि भाजपाच्या आमदारांचं मत झालं. पण, भविष्यातील राजकारणासाठी टाकलेल्या डावातून हे सर्व घडलं, हे आम्ही समजून घेतलं आहे. अजून १४ मंत्रिपद आहेत. यासाठी देवीला साकडं घातलं आहे.”