scorecardresearch

Premium

करोनातल्या लॉकडाऊननंतर महाराष्ट्रात बालविवाह वाढले; रुपाली चाकणकर यांचा दावा

लातूरमधल्या कार्यक्रमात बोलत असताना रुपाली चाकणकर यांनी हा दावा केला आहे.

What Rupali Chkankar Said?
रुपाली चाकणकर यांचं लातूरमध्ये वक्तव्य

करोना काळात जो लॉकडाऊन लागला त्यानंतर बालविवाह वाढले आहेत असा दावा रुपाली चाकणकर यांनी केला. महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लातूरमध्ये एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तिथे त्यांनी हा दावा केला. मोबाइल फोनच्या अतिवापरामुळे अनेकांचं अभ्यासावरुनही लक्ष उडालं आहे. मोबाइल फोनमुळे आई-वडील आणि मुलांमधला संवाद संपला आहे असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे रुपाली चाकणकर यांनी?

“आई वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये संवाद संपला आहे. यामुळेच मुली प्रेमात पडून घरातून पळून जाऊ लागल्या आहेत. करोना काळात प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन लावण्यात आला होता. या काळात महाराष्ट्रात बालविवाह वाढले.” लातूरच्या एका संमेलनात त्यांनी हे मत व्यक्त केलं.

Dhananjay-Munde-13
पीक विमा भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न – धनंजय मुंडे
Academic Bank of Credit website
‘ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट’ संकेतस्थळावरील विद्यार्थी नोंदणीत महाराष्ट्राची आघाडी, देशभरातील २ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
What Sudhir Mungantiwar Said?
“छत्रपती शिवरायांची वाघनखं फक्त तीन वर्षांसाठीच महाराष्ट्रात येणार, त्यानंतर….”, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
Ganpati Visarjan 2023
पुढच्या वर्षी लवकर या..! लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप

हे पण वाचा- कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; आरोपीस अटक, कठोर कारवाईची मागणी

लातूरमध्ये रुपाली चाकणकर म्हणाल्या एकटा लातूर जिल्हा असा आहे जिथे ३७ बालविवाह रोखले गेले. महाराष्ट्रात बालविवाहांचं प्रमाण वाढलं आहे असं रुपाली चाकणकर म्हणाल्या पण त्यांनी ठराविक कुठलीही आकडेवारी सादर केली नाही. गावांमध्ये जेव्हा ग्रामसभा घेतल्या जातात तेव्हा बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजनांवर चर्चा झाली पाहिजे. आई वडिल आणि मुलांमध्ये जो संवाद संपला आहे त्यामुळे अनेकदा मुली घर सोडून जातात असंही समोर आलं आहे. प्रेमात पडतात, घर सोडून पळून जातात असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

हे पण वाचा- किरीट सोमय्यांच्या व्हिडीओची महिला आयोगाकडून दखल, रुपाली चाकणकर म्हणाल्या, “आक्षेपार्ह…”

रुपाली चाकणकर म्हणाल्या पोलिसांच्या दामिनी स्क्वाडने मुलींना सुरक्षा पुरवण्यासह त्यांच्याशी चर्चाही केली पाहिजे. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत महिला आयोगाने महाराष्ट्रातल्या २८ जिल्ह्यांमधल्या जवळपास १८ हजार तक्रारींचा निपटारा केला आहे. सोमवारी आम्हाला लातूर जिल्ह्यात ९३ तक्रारी मिळाल्या त्यानंतर आम्ही त्या तक्रारी सोडवण्याच्या त्या दिशेने काम करतो आहोत असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Child marriages surged in maharashtra after covid 19 lockdown rupali chakankar claim in latur scj

First published on: 29-08-2023 at 12:56 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×