पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केला जाणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाचा गवगवा अनाकलनीय आहे. गांधींचे नाव घ्यायचा अधिकार सर्वानाच आहे. पण मोदींनी पहिल्यांदा नथुराम गोडसेचा संघाच्या व्यासपीठावरून निषेध करावा आणि मगच गांधींचे नाव घ्यावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांनी शनिवारी दिले.