बीड : भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी राज्यातील विकासाची अनेक स्वप्ने पाहिली होती. त्यापैकी अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. अहमदनगर ते आष्टी या पहिल्या टप्प्यातील ६७ किलोमीटर रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होऊन पहिल्या प्रवासी रेल्वेसेवेचा शुभारंभ झाल्याने गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न सत्यात उतरल्याचे भावोद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. बीड व अहमदनगर या दोन जिल्ह्यांना जोडणारी रेल्वे विकासाची भाग्यरेखा ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गावरील नवीन आष्टी रेल्वेस्थानकासह आष्टी ते अहमदनगर दरम्यान डेमू सेवेचे उद्घाटन बीड जिल्ह्यातील आष्टी येथे शुक्रवारी झाले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते, तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार प्रीतम मुंडे आणि सुजय विखे पाटील, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First passenger train started from ahmednagar to ashti after completed 67 km broad gauge line zws
First published on: 24-09-2022 at 03:53 IST