औरंगाबाद या शहराचे नाव संभाजी नगर करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होते आहे. शिवसेनेने ही मागणी लावून धरली आहे. मात्र या मागणीवर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. आता या संदर्भात विक्रांदचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले आहे.

भाजप आणि शिवसेनेची सत्ता असताना शहरांचे नामांतर होत नाही फक्त राजकीय मुद्दा म्हणून नामांतराचा वापर होतो. हे राजकारण थांबले पाहिजे आणि या मागणीचा विचार झाला पाहिजे असे निदर्शनास आले आहे. औरंगाबाद शहरापासून १५ ते २० किलोमीटर अंतरावर वाळूज एमआयडीसी आहे. तसेच या भागात अनेक गावेही आहेत. सिडकोसारखी टाऊनशिप उभी करण्याचा प्रयत्न झाला पण सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्याचमुळे या परिसराला नव्या महापालिकेचा दर्जा द्यावा आणि नव्या महापालिकेला संभाजी नगर असे नाव द्यावे अशी मागणी पवार यांनी केली आहे.

Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
ajit pawar and supriya sule
स्नुषाविरोधात प्रचार करण्यास नकार देण्याची एकनाथ खडसेंची भूमिका सुसंस्कृतपणाची;  खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना चिमटा

मुख्यमंत्र्यांनी जर हा प्रस्ताव मान्य केला तर अनेक प्रश्न सुटू शकतात असेही पवार यांनी म्हटले आहे. ठाणे शहराच्या बाजूला मीरा भाईंदर, वसई-विरार, कल्याण डोंबिवली, पनवेल, भिवंडी, पिंपरी चिंचवड अशा महापालिका आहेत. त्याचप्रमाणे वाळूज परिसराला महापालिकेचा दर्जा द्यावा ज्यामुळे इथे विकास होईल असेही पवार यांनी म्हटले आहे. या नामांतराच्या मुद्द्यावरूनच चंद्रकांत खैरे आणि रामदास कदम यांच्यात गेल्याच आठवड्यात वाद रंगला होता. आता उत्तमसिंह पवार यांनी मात्र या प्रश्नावर वेगळाच तोडगा काढून मुख्यमंत्र्यांना या संदर्भातले पत्रच लिहिले आहे.