अमरावती जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून गेल्या चोवीस तासांत सात तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने चारगड नदीला पूर आला आहे. या पुरामुळे राज्य महामार्ग क्रमांक ३६५ वरील चारगड नदीवरील पूल वाहून गेला.

अकोला : पश्चिम वऱ्हाडात संततधार पाऊस ; नदी-नाल्यांना पूर

Unseasonal weathe hail in Vidarbha Three districts of Marathwada are also affected by rain
विदर्भात अवकाळी, गारपीट; मराठवाडय़ाच्या तीन जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा
nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला
thane district, administration, thane water supply department
लोकसत्ता इम्पॅक्ट : ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले, पाणी टंचाई आधीच टँकर सुरू करण्याच्या दिल्या सूचना

एक वर्षांपासून या नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून निर्माणाधिन पुलाच्या बाजूला असलेला वाहतुकीचा पूल मुसळधार पावसाने आलेल्या पुरामुळे वाहून गेला. यामुळे परतवाडा ते घाटलाडकीमार्गे मोर्शी हा रस्ता वाहतुकीकरिता बंद झाला आहे. 

वर्धा धरणाची सर्व १३ दारे १५० सेंटीमीटरने उघडण्यात आली –

दरम्यान, अप्पर वर्धा धरणाची सर्व १३ दारे १५० सेंटीमीटरने उघडण्यात आली आहेत. धरणातून सध्या ३ हजार १५० घन मीटर प्रतिसेकंद विसर्ग (क्युसेक) सुरू आहे. याशिवाय पूर्णा प्रकल्पाची ९ दारे ५० से.मी. उघडण्यात आली असून १३६ क्यूसेक विसर्ग सुरु आहे. शहानूर, सपन, पाक नदी प्रकल्पातूनदेखील पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. धारणी, चिखलदरा, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, अमरावती, चांदूर बाजार या तालुक्यात अतिृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात चोवीस तासात ५७.५ मिमी पाऊस झाला.