सांगली : सांगली जिल्ह्यातील वारणाकाठासह म्हैसाळ सिंचन योजनेखाली असलेल्या पूर्व भागाला वरदान ठरणारे चांदोली धरण सोमवारी रात्री तुडुंब भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक पाऊस अजूनही सुरू असल्याने पायथा विद्युतगृहाद्वारे नदीपात्रात ४५० क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे.

यंदा पावसाने ओढ दिल्याने धरण भरेल की नाही, अशी शंकास्पद स्थिती निर्माण झाली होती. पण त्यानंतर पावसाच्या पुनरागमनानंतर धरण शंभर टक्के भरले आहे. धरणाची क्षमता ३४.४० टीएमसी असून सध्या धरणातील पाणीसाठा ३४.४१ टीएमसी झाला आहे. धरणात पाण्याची आवक १ हजार १०२ क्युसेक प्रतिसेकंद आहे.

nagpur, acid attack, acid attack in Nagpur, Girlfriend Throws Acid on Boyfriend's Face, Girlfriend Boyfriend Argument, Severe Injuries Reported, Nagpur crime news, crime in Nagpur, Nagpur accid attack case,
नागपुरात ॲसिड हल्ला; प्रेयसीने प्रियकराच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले
Rising Temperatures, Heat Wave, Heat Wave in maharashtra, Health System on Alert, summer, summer news, summer 2024, summer in Maharashtra, imd, marath news, temperature news,
शनिवार, रविवार राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली

हेही वाचा : पडळकरांसह अजित पवार गटातील नेत्यांवर रोहित पवारांचा संताप; म्हणाले, “चॉकलेट बॉय…”

यंदाच्या हंगामात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ हजार ६५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर धरण काठोकाठ भरले आहे. तर पश्‍चिम घाटात महत्वाचे असलेल्या कोयना धरणात मंगळवारी सकाळी ८९.३३ टीएमसी पाणीसाठा झाला असून एकूण क्षमतेच्या ८४.२७ टक्के पाणीसाठा झाला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : आमंत्रण नसताना बिबट्या पार्टीला; पोरांची मात्र पळता भुई थोडी

गेल्या २४ तासांत कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात कोयना येथे २९ , महाबळेश्‍वर येथे ५३ तर नवजा येथे २१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस शिराळा तालुक्यात झाला. शिराळा तालुक्यात १२.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.