कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कोल्हापुरातील सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शेरो-शायरीच्या माध्यमातून टीका केली होती. याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांना इमानदारी सिद्ध करायला लावणाऱ्यांची लायकी काय? असं टीकास्र जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सोडलं आहे.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

“मेरी कोई खता तो साबीत कर, बुरे है तो बरा साबीत कर, तुझे चाहा है, कितना तू क्या जाने, चल हम बेवाफा ही सही, तू अपनी वफा तो साबीत कर,” असा थेट हल्लाबोल धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर केला होता.

balasaheb thorat reaction anil bonde remark on rahul gandhi
अनिल बोंडे यांचे बोलविते धनी भाजपचे नेते, त्यांचे वक्तव्य म्हणजे नथुराम गोडसे प्रवृत्ती – बाळासाहेब थोरात यांच्याकडून संताप व्यक्त
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
Ajit pawar and jitendra awhad
Jitendra Awhad : “एवढाच पश्चाताप होतोय तर…”, अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचं आव्हान, म्हणाले…
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
Devendra Bhuyar, Asha sevika, BJP allegation ,
आमदार देवेंद्र भुयार यांची ‘लाडक्या बहिणीं’वर दादागिरी; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
amol mitkari on tanaji sawant
Amol Mitkari : अजित पवार गटाबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींचा मंत्री तानाजी सावंतांना टोला; म्हणाले, “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते…”
kangana Ranaut and simranjit singh mann
Kangana Ranaut : “कंगना रणौत यांना बलात्काराचा खूप अनुभव”, माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

हेही वाचा : “विखे-पाटलांबरोबर यशोमती ठाकूरही भाजपात प्रवेश करणार होत्या, पण…”, रवी राणांचा मोठा दावा

यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शायरीच्या माध्यमातून शरद पवार यांना आव्हान देण्यात आलं की, तुम्ही इमानदार आहात, हे सिद्ध करा. यांना शायरी किती समजते, हे मला माहिती नाही. शरद पवारांना इमानदारी सिद्ध करायला सांगण्याएवढी तुमची लायकी आहे का?”

“हातवारे करून शायरी म्हणायला मजा येते. पण, शरद पवारांना इमानदारी सिद्ध करायला महाराष्ट्र पडला आहे,” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

हेही वाचा : VIDEO : “देवेंद्र फडणवीसांनी संभाजी भिडेंना जरांगे-पाटलांकडे पाठवलं असेल, तर…”, जयंत पाटलांचा टोला

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी कोल्हापूरात शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. “एकीकडं लोकशाही आणि स्वाभिमानाची ग्वाही द्यायची. ज्यांनी तुमच्याबरोबर हयात घालवली त्यांच्यावर बोलायचं. तुम्ही जीव द्यायला लावला असता, तर दिला असता. पण, काही जणांचे मतदारसंघ सांभाळायचे म्हणून असा दुर्दैवी निर्णय घेतला,” अशी टीका धनंजय मुंडेंनी शरद पवार यांच्यावर केली.