Mumbai Maharashtra Breaking News , 06 September 2023: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. कुणबी समाजाला मराठा म्हणून मान्यता देण्याचा अध्यादेश काढण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून याच मागणीसाठी त्यांचं उपोषण चालू आहे. राज्य सरकारने यासंदर्भात उच्चाधिकार समितीमार्फत अहवाल मागवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही मनोज जरांगे अध्यादेश निघेपर्यंत उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळे आता राज्य सराकर काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Live Updates

Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी एका क्लिकवर!

19:43 (IST) 6 Sep 2023
पिंपरी : गणेशोत्सवात आवाजाची मर्यादा पाळा, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या गणेश मंडळांना सूचना

पिंपरी : गणेश मंडळांनी ध्वनिवर्धक यंत्रणा लावताना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक किंवा इतरांचा विचार करावा. आवाजाने कोणालाही त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी. ध्वनिप्रदूषण करु नये. गणेशोत्सवामध्ये आवाजाची मर्यादा पाळावी, अशा सूचना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गणेश मंडळांना केल्या.

वाचा सविस्तर…

19:42 (IST) 6 Sep 2023
Maharashtra Maratha Andolan: राज्य सरकारचा निर्णय.. वाचा सविस्तर…

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.

आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जारंगे – पाटील यांनी ‘निजामकालीन महसुली रेकॉर्ड तपासून याठिकाणी पूर्वी जे कुणबी म्हणून नोंदणीकृत होते त्यांना मान्यता’ देण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने ही समिती स्थापन करण्यात येत आहे.

ही समिती महसुली, शैक्षणिक व संबंधित नोंदी तपासून मागणीनुसार निजामकालीन ‘कुणबी’ नोंद असणाऱ्या मराठा समाजास ‘कुणबी’ दाखले देण्याकरिता अशा प्रकरणांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करणे व त्याबाबतची कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करेल. याबाबत समिती अहवाल तयार करून तो एक महिन्यात शासनास सादर करेल. निवृत्त न्यायाधीश न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, तसेच संबंधित सर्व जिल्हयांचे जिल्हाधिकारी सदस्य म्हणून काम पाहतील. तसेच औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर)चे विभागीय आयुक्त समितीचे सदस्य सचिव असतील. यापुर्वीची महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समिती देखील या समितीस पूरक माहिती देण्याचे काम करेल.

19:41 (IST) 6 Sep 2023
Maharashtra Maratha Andolan: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय…

१. वंशावळीत कुणबी उल्लेख असल्यास त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल.

२. आरक्षणासंदर्भात निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

३. समिती महिन्याभरात आरक्षणासंदर्भात अहवाल देणार

४. चुकीच्या पद्धतीने आंदोलकांवर दाखल केलेले खटले हटवले जाणार

19:14 (IST) 6 Sep 2023
अरेरे! जखमी शिंगरूने मदत न मिळाल्याने अखेर सोडले प्राण

ना शिंगरू उठले, ना मदतीसाठी कोणी धावून आले. मुक्या प्राण्यांच्या भावनाही मुक्याच ठरल्या.

वाचा सविस्तर…

18:32 (IST) 6 Sep 2023
शेगाव आगाराच्या बसचे ब्रेक निकामी; चालकामुळे टळली दुर्घटना

बुलढाणा: शेगाव आगाराच्या लांब पल्ल्याच्या बसचे ब्रेक ऐन प्रवासात निकामी झाल्याने त्यातील सुमारे ४५ प्रवाश्यांचे जीव धोक्यात आले होते.

सविस्तर वाचा…

18:15 (IST) 6 Sep 2023
Maharashtra Maratha Andolan: आंदोलनात राजकारण चाललंय? जरांग पाटील म्हणतात…

मी त्या गोष्टीला महत्त्वच देत नाही. माझ्या समाजाला माहिती आहे मी काय आहे. राजकारण आंदोलनात घुसलं अन फसलं ते उद्योग बघ म्हणावं तुझे तू. आमच्या लफड्यात तू पडू नको. हे मराठवाड्याचं गबाळं जमलेलं आहे. खानदानी पोरांनी आंदोलन उभं केलं आहे. हे काय कुठल्या राजकारण्यानी-फाजकारण्यानी आंदोलन केलेलं नाही. हे महाराष्ट्रातले जातवाहन पोरं आहेत. आम्ही आमचे गरीबाचे लेकरं आहोत. आम्ही आमच्या भाकऱ्या आणतो, इथे जेवतो आणि उघड्यावर झोपतो. आंदोलनावर कोणता डाग वगैरे लावू नको. तुझं जर नाव कळालं ना, तुझं टमराळंच वाजवीन मी.. जो कुणी आंदोलन करणारा आहे तो… – मनोज जरांगे पाटील

18:12 (IST) 6 Sep 2023
Maharashtra Maratha Andolan: सरकारच जनतेला वेठीस धरतंय – मनोज जरांगे पाटील

मागणी करून पर्याय आम्हीच देत आहोत, पुरावेही आम्हीच देत आहोत. पण तरीही तुम्हाला आरक्षण द्यायचं नसेल तर आंदोलनाला किंवा जनतेला सरकारच वेठीला धरतंय असा अर्थ निघण्याची शक्यता आहे – मनोज जरांगे पाटील

18:09 (IST) 6 Sep 2023
Maharashtra Maratha Andolan: आम्ही सरकारचा वेळ वाचवतोय – जरांगे पाटील

तुमची समिती वर्षभरात जेवढा डाटा गोळा करेल, तेवढा आम्ही तुम्हाला एका दिवसात देतोय. त्यामुळे आम्ही सरकारचा वेळ वाचवतोय – मनोज जरांगे

18:07 (IST) 6 Sep 2023
Maharashtra Maratha Andolan: आता निर्णय घ्या – मनोज जरांगे

राज्यपालांची परवानगी घेऊन कायदा करण्याचा अधिकार सरकारला आहे. वटहुकूम जारी केला जाऊ शकतो. आम्ही दिलेले पुरावे घेऊन वटहुकूम काढण्याचा निर्णय घ्या – मनोज जरांगे

18:06 (IST) 6 Sep 2023
Maharashtra Maratha Andolan: सरकारनं आता वेळ मागू नये – मनोज जरांगे

विधानसभा नसली तरी आपण वटहुकूम काढू शकता इतके कायदेशीर पुरावे आम्ही तुम्हाला दिले आहेत. आता सरकारने मुदत मागण्याचं कारण नाही. एका दिवसात आपण राज्यपालांच्या परवानगीने वटहुकूम काढू शकता. मी तुमच्यासोबत तज्ज्ञही पाठवायला तयार आहे. आता सरकारने वेळ मागू नये. – मनोज जरांगे

17:05 (IST) 6 Sep 2023
पनवेलमध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी २० कृत्रिम तलाव, ९३ लाख रुपये खर्चाचे नियोजन

पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रात मागील वर्षी वडघर येथील विसर्जन घाटावर दुर्घटनेत ११ जणांना विजेचा शॉक लागल्याने गणेशभक्तांमध्ये खळबळ माजली होती. या घटनेतून बोध घेऊन यंदा पनवेल पालिका प्रशासनाने २० वेगवेगळे कृत्रिम तलाव आणि प्रत्येक प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणाऱ्या मुख्य अशा चार विसर्जन घाटांवर देखभाल दुरुस्तीसाठी तसेच वीज व्यवस्था मंडपासाठी विशेष नियोजन केले आहे.

सविस्तर वाचा…

16:58 (IST) 6 Sep 2023
वाशिम जिल्ह्यातील पीक स्थिती चिंताजनक; शासन दरबारी पाठपुरावा करण्याची वड्डेटीवारांची ग्वाही

वाशिम: विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात होते. त्यांनी सकाळी १० वाजे दरम्यान थेट शेतीच्या बांधावर पोहोचून पीक परिस्थितीची पाहणी केली.

सविस्तर वाचा…

16:50 (IST) 6 Sep 2023
भंडारा : शिक्षक दिनीच शिक्षकाने गळफास घेऊन संपविले जीवन, तीन महिन्यांपासून वेतन नाही, मानसिक त्रासाचा आरोप

भंडारा : शासकीय आयटीआय तुमसर येथील यांत्रिक इलेक्ट्रॉनिक्स या पदावर कार्यरत असलेले शिल्पनिदेशक योगेश नगरकर यांनी महाविद्यालय प्रशासनाच्या छळाला कंटाळून शिक्षकदिनीच आत्महत्या केली. या घटनेने शिक्षण विश्वात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा…

16:23 (IST) 6 Sep 2023
मराठा आंदोलनाला राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याकडून खतपाणी घातलं जातंय का? बाळासाहेब थोरात म्हणाले…

जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यानंतर राज्यभरात पुन्हा एकदा मराठा आंदोलक आक्रमक झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनाला राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याकडून खतपाणी घातलं जात असल्याचा आरोप होत आहे. याबाबत काँग्रेसचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांना विचारणा केली असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ते बुधवारी (६ सप्टेंबर) अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

सविस्तर वाचा…

16:20 (IST) 6 Sep 2023
“मोदी सरकार चांद्रयानात बसून वर चंद्रावर जाऊन …”; संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले…

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारकडून 'इंडिया' नावाचा वापर टाळला जात आहे त्यावर सडकून टीका केली. “देशातील विरोधी पक्षांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली, म्हणून इंडियाचं नाव पुसून टाकण्यासारखा दुसरा घाबरटपणा, कद्रुपणा, विकृतपणा नाही,” असं म्हणत संजय राऊतांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ते बुधवारी (६ सप्टेंबर) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

सविस्तर वाचा…

16:06 (IST) 6 Sep 2023
Maharashtra Breaking News: फडणवीसांनी केलेलं हे पाप होतं – नाना पटोले

जालन्याच्या उपोषणावर सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले होते. तो सौम्यच्या ऐवजी मोठा झाला. इंडिया आघाडीची बैठक त्याच काळात होती. त्यावरून लक्ष वळवण्यासाठी केलेलं हे पाप होतं. त्यात ते फसले. फडणवीसांनी आत्तापर्यंतच्या राजकारणात पहिल्यांदा माफी मागितली. त्यांनी गुन्हा केला म्हणून त्यांनी माफी मागितली – नाना पटोले

16:04 (IST) 6 Sep 2023
Maharashtra Breaking News: ठाणे पालिका कुणाची जहागीर आहे का – आव्हाड

ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनावरील 1 जानेवारी, 2016 नंतर कायमस्वरुपी कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना 7 वा वेतन आयोग आजही लागू केला जात नाही. त्यांच्यावर होणारा हा अन्याय आहे. 7 वा वेतन आयोग हा सगळ्यांना लागू केलाच पाहीजे, असं कायदा सांगत असताना ठाणे महानगरपालिका ही कोणाची जहागीर आहे की, जे मनात येईल ते करतात – जितेंद्र आव्हाड

16:02 (IST) 6 Sep 2023
कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मराठा समाजाकडे व्यक्त केली दिलगिरी

कोल्हापूर : मराठा समाज आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्यातून वाद वाढत चालला असताना बुधवारी रेखावार यांनी याप्रकरणी मराठा समाजाकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. राहुल रेखावर यांनी केलेल्या विधानाच्या संदर्भात मराठा नेत्याकडून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला होता. हा वाद तीन आठवडे तापत होता, पण आता त्यांनी या माध्यमातून वादावर पडदा टाकला आहे.

सविस्तर वाचा…

15:54 (IST) 6 Sep 2023
ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी पाणी नाही

ठाणे: शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या निगा आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेच्या स्वत:च्या योजनेचा आणि स्टेम प्राधिकरणाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

15:34 (IST) 6 Sep 2023
स्वच्छ हवेसाठी देशभरातून ८०० हून अधिक नागरिक एकवटले, उद्या आभासी मानवी साखळी…

नागपूर : राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या शंभरहून अधिक संस्थांनी स्वच्छ हवेसाठी एकत्रित येऊन आभासी मानवी साखळी (व्हर्च्युअल ह्यूमन चेन) तयार केली आहे. सात सप्टेंबर या ‘इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्ल्यू स्काईज’च्या निमित्ताने या संस्था, जागरुक नागरिक एकवटले आहेत.

सविस्तर वाचा…

15:20 (IST) 6 Sep 2023
Maharashtra Breaking News: नितेश राणेंचा थेट शरद पवारांना सवाल, म्हणाले…

देवेंद्रजी फडणवीस यांच्याबाबतीत जातीचे घाणेरडे राजकारण सुरु आहे. मग मराठा नसलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कसे चालले. शरद पवार यांच्यासमोर मी लहान तरीही प्रश्न विचारतो जातीचा प्रश्न असेल तर उद्धव ठाकरे हे मराठा नाहीत ते तुम्हांला चालतात त्यांच्या मुखपत्रात मुका मोर्चा बोलतात आमच्या वंशजांचा पुरावा मागितला जातो ते कसे चालतात ?

15:18 (IST) 6 Sep 2023
15:16 (IST) 6 Sep 2023
Maharashtra Breaking News: पुढे काय होईल तुम्हाला आत्ताच सांगतो… – आदित्य ठाकरे

मी राज्यपालांना विनंती केली की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना समज द्यावी की राज्य चालवायचं कसं? कारण सगळीकडे अंदाधुंद कारभार दिसतोय. राज्यात एक घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री आहेत. यात नेमका जनरल डायर कोण? हे समोर यायला हवं. काय होणार तुम्हाला आत्ताच सांगतो. खारघर प्रकरणी चौकशी नेमली तशी बसवली जाईल. जेव्हा अहवाल येईल तेव्हा एखाद्या आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्याला सस्पेंड केलं जाईल. पण सरकारमधून ज्यांनी आदेश दिले, त्यांना काहीही होणार नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे – आदित्य ठाकरे

15:12 (IST) 6 Sep 2023
Maharashtra Breaking News: आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी आम्ही केली आहे. सरकार आपल्या दारी कार्यक्रम घेण्यासाठी लाठीचार्ज केला गेला. लाठीचार्ज करण्याची गरज नव्हती. अशा कारवाईसाठी मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांकडून आदेश घेतले जातात. पण हे म्हणतात आम्ही आदेश दिलेच नाहीत. असं असेल तर मग सरकार चाललंय कसं? – आदित्य ठाकरे

14:35 (IST) 6 Sep 2023
सिडकोच्या उरणमधील तिन्ही रेल्वे पुलांवर विजेचा लपंडाव, प्रवाशांचा अंधारातून धोकादायक प्रवास

सिडकोने उरण तालुक्यात बोकडवीरा ते नवीन शेवा व फुंडे विद्यालय ते नवघर असे तीन रेल्वे उड्डाणपूल उभारले आहेत. मात्र या तिन्ही पुलांवर सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे.

सविस्तर वाचा…

14:35 (IST) 6 Sep 2023
गोंदिया : पावसाळा शेवटच्या टप्प्यात, पण तलावांच्या जिल्ह्यातील अनेक प्रकल्प रितेच! केवळ पाच प्रकल्प पूर्ण भरले

गोंदिया : यंदा पावसाने सर्वांचेच टेन्शन वाढवले आहे. यामुळेच पाऊस शेवटच्या टप्प्यात असतानाही जिल्ह्यातील ३२ मध्यम व लघु प्रकल्पांपैकी केवळ पाच प्रकल्पांत १०० टक्के पाण्याचा साठा आहे. मात्र, इतर प्रकल्पांमध्ये पाणी नसल्याने अनेक प्रकल्प रिकामेच आहेत. अशा स्थितीत मुसळधार पावसाची नितांत गरज आहे, मात्र, तसे न झाल्यास पुढील वर्ष कठीण जाईल.

सविस्तर वाचा..

14:24 (IST) 6 Sep 2023
जन्माष्टमी विशेष : रुक्मिणी हरणाशी आहे अमरावतीच्या ‘या’ मंदिराचा संबंध; काय आहे आख्यायिका, जाणून घ्या…

अमरावती : भीष्मक राजा यांची कन्या रुक्मिणी अमरावती येथील अंबादेवीच्या दर्शनासाठी आल्या असताना भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे हरण केले, अशी आख्यायिका आहे. पण या मंदिरासोबतच स्थानिक माताखिडकी परिसरातील पुरातन श्रीकृष्ण मंदिराचेही नाते आहे. या मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

14:18 (IST) 6 Sep 2023
जालना येथील घटनेचे पडसाद कायम, वाशीत आघाडीने केली निदर्शने

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा अध्यादेश निघेपर्यंत उपोषण न सोडण्याचा इशारा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे.

सविस्तर वाचा…

13:49 (IST) 6 Sep 2023
नागपुरात जी-२० फलकाचा बॅरिकेड्स म्हणून वापर

छत्रपती चौकात सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. येथे जी-२० च्या प्रचार फलकाचा वापर वाहतूक कठडे म्हणून केला जात आहे.

सविस्तर वाचा…

13:47 (IST) 6 Sep 2023
‘लोकसंवाद’ यात्रेला चंद्रपुरात अल्प प्रतिसाद! कारण काय, जाणून घ्या…

नागपूर : महागाई, बेरोगारी, शेतमालास भाव तसेच तपास यंत्रणेचा दुरुपयोग, आदी मुद्दे घेऊन काँग्रेसने महाराष्ट्रात लोकसंवाद यात्रेला प्रारंभ केला आहे. या यात्रेची जबाबदारी प्रमुख नेत्यांमध्ये विभागीयनिहाय वाटून घेण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर विभाग तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे पश्चिम विदर्भ म्हणजे अमरावती विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

13:46 (IST) 6 Sep 2023
जागेच्या मोबदल्यात कारागृहाचा विकास, महामेट्रोकडून आश्वासन भंग?

कारागृहाकडे असलेली मोक्याची जागा गेली आणि त्यांच्या हातीही काही आले नाही.

सविस्तर वाचा…

13:29 (IST) 6 Sep 2023
दोन मालगाड्यांना जोडल्याने प्रवासी रेल्वे गाड्यांना मार्ग कसा मिळतो?

नागपूर : मध्य रेल्वेने दोन मालवाहू रेल्वेगाड्या एकत्र जोडून मालवाहतूक करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. चालू आर्थिक वर्षातील पाच महिन्यांत अशा ५७ गाड्यांनी मालवाहतूक केली आहे. या प्रयोगामुळे मालवाहतूक जलदगतीने शक्य झाली असून दोन मालगाड्या एकत्र धावल्याने इतर गाड्यांना रेल्वेमार्ग उपलब्ध होत आहे.

सविस्तर वाचा…

13:09 (IST) 6 Sep 2023
खारघरमध्ये एनएमएमटी बसला आग, सुदैवाने जिवितहानी नाही, प्रवासी सुखरूप

काही क्षणात आगीने बसला भस्मसात केले. या आगीत कोणतीही दुर्घटना झाली नाही.

सविस्तर वाचा…

13:00 (IST) 6 Sep 2023
कर्मचारी नव्हे साक्षात ‘देवदूत’च! सतर्कतेमुळे टळले मोठे रेल्वे अपघात; ‘महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कारा’ने सन्मान

अमरावती: कर्तव्यावर असताना सतर्कता बाळगून अनुचित घटना टाळणाऱ्या मध्‍य रेल्‍वेच्‍या २० रेल्‍वे कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार’ प्रदान करण्‍यात आला.

सविस्तर वाचा…

12:55 (IST) 6 Sep 2023
Maharashtra Breaking News: शिंदे सरकारवर ठाकरे गटाचा व्हिडीओच्या माध्यमातून हल्लाबोल!

गलिच्छ राजकारण करून, हुकूमशाही लादू पाहणाऱ्या ह्या महाराष्ट्रद्वेष्ट्या सरकारला आता जनताच धडा शिकवणार!

12:44 (IST) 6 Sep 2023
मुंबई अहमदाबाद महामार्गावर कारला ट्रकची धडक, कारमधील तिघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

वसई – मुंबई अहमदाबाद महामार्गावर भरधाव वेगाने जाणार्‍या मारुती स्विफ्ट कारला ट्रकने दिलेल्या धडकेत कारचालकासह तिघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. बुधवारी सकाळी ६ वाजता महामार्गावरील सातिवली येथील बजरंग ढाब्यासमोर हा अपघात घडला.

सविस्तर वाचा…

12:30 (IST) 6 Sep 2023
Maharashtra Breaking News: मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचं विशेष अधिवेशन?

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण कायम ठेवलं असून अध्यादेश निघेपर्यंत ते मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. दुसरीकडे आता राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी विधेयक आणण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात असून त्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं जाऊ शकतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

12:29 (IST) 6 Sep 2023
वसंतराव नाईक महामंडळाच्या जळगाव जिल्हा व्यवस्थापकासह कर्मचार्‍यास लाच घेताना अटक

उर्वरित २५ हजारांचा हप्ता मंजूर करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक भीमराव नाईक यांनी स्वतःसाठी तीन हजार व कंत्राटी सेवक आनंद कडेवाल यांच्यासाठी दोन हजारांची लाच मागितली.

सविस्तर वाचा…

12:17 (IST) 6 Sep 2023
नदीचे खोलीकरण, रुंदीकरण कोण करणार? चंद्रपूर पालिका आणि पाटबंधारे विभाग आमनेसामने

चंद्रपूर : नदी खोलीकरण व रुंदीकरणच्या मुद्यावरून पाटबंधारे विभाग आणि चंद्रपूर महानगरपालिका आमने-सामने आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एकमेकांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

सविस्तर वाचा..

12:11 (IST) 6 Sep 2023
“उद्योगपतीधार्जिन्या सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांशी देणे-घेणे नाही,” विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप, म्हणाले…

यवतमाळ: उद्योगपती मित्रांसाठी काम करणाऱ्या या सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांशी कसलेही देणे-घेणे नाही. केंद्र व राज्यातील भाजप सरकार शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागले आहेत.

सविस्तर वाचा…

12:00 (IST) 6 Sep 2023
Maharashtra Breaking News: आदित्य ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मैं अभिनंदन करना चाहता हूँ हमारे देशभक्त साथी राजनीतिक दलों का। “भारत जोड़ो यात्रा” से हो, “जुड़ेगा भारत- जीतेगा INDIA” की अलायंस हो, इस बहाने, “खेलों इंडिया”, “फिट इंडिया”, “मेक इन इंडिया”, “स्किल इंडिया” जैसे नारेबाजी में व्यस्त सरकार को याद दिलाया कि हमारे देश का नाम India भी है, और भारत भी! लेकिन अभी यह भी सोचना जरूरी है कि जो भूमि चीन ने हमसे छिनी है, वह भी भारत है, और जो G20 के लिए curtain cover के पीछे छुपाए गये है, वह भी भारतवासी है। जो कश्मीरी पंडित पीड़ित है, वह भी भारतवासी है, और अत्याचार से पीड़ित मणिपुर की महिलाएँ भी भारतवासी है! हमारी राजनैतिक जंग इसी भारत- India के लोकतंत्र की है, इसी देश के संविधान की है! हमारे देश में एकता, शांति, प्रगति और अखंडता के लिए है! गर्व है भारतीय होने का, Indian होने का! वन्दे मातरम् जय हिन्द!

11:59 (IST) 6 Sep 2023
Maharashtra Breaking News: आव्हाडांचं ट्वीट, इंडिया नावावरून हल्लाबोल

राज्यघटनेच्या प्रतिज्ञेशी कुणीही वाटलं म्हणून खेळ करू शकत नाही – जितेंद्र आव्हाड

11:57 (IST) 6 Sep 2023
‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ : विदेशात नोकरी करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी शासनाचे सुविधा केंद्र

वर्धा : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे एक नवी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. विभागाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेतर्फे ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्रास प्रारंभ होत आहे.

वाचा सविस्तर…

<a href="https://www.facebook.com/LoksattaLive“>

11:43 (IST) 6 Sep 2023
कुलर ठरला किलर! विजेचा धक्का लागून मायलेकाचा मृत्यू; आर्णी तालुक्यातील घटना

घरातील कुलर सुरू करताना मुलाला विजेचा धक्का बसला. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या आईलाही विजेचा धक्का लागला.

सविस्तर वाचा…

11:41 (IST) 6 Sep 2023
भाजी विक्रेत्याने बाजारातून चोरल्या तब्बल ३१ दुचाकी! मध्यप्रदेशात कवडीमोल भावाने विक्री

नागपूर: आठवडी बाजारात आलेल्या भाजी विक्रेत्याने तब्बल ३१ दुचाकी चोरी करून मध्यप्रदेशात वाहनांची कवडीमोल भावाने विक्री केली.

सविस्तर वाचा…

11:41 (IST) 6 Sep 2023
देहूरोडमध्ये श्वानांचा छळ; दोघांविरोधात गुन्हा

पिंपरी: देहूरोड येथे प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये तीन श्वानांना बांधून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास संकल्पनगरी येथे घडली.

सविस्तर वाचा…

11:40 (IST) 6 Sep 2023
सावधान! रेल्वेने विनातिकीट प्रवास करताय…

पुणे: रेल्वे प्रशासनाकडून फुकट्या प्रवाशांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात ऑगस्ट महिन्यात १९ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवासी सापडले आहेत.

सविस्तर वाचा…

11:36 (IST) 6 Sep 2023
Maharashtra Breaking News: बॉम्बेचं मुंबई होऊ शकतं तर… – पंकजा मुंडेंची इंडिया वादावर भूमिका

आपलं नाव भारत आहे. इंंडिया झालंय. बॉम्बे मुंबई होऊ शकतं, तसं इंडियाही भारत होऊ शकतं. देशातले सर्व लोक काय मत व्यक्त करतील यावर हे ठरेल. पण आपण दोन्हीत राहात नाही. त्या काळात वसाहतवादी इंग्रजांनी हे नाव दिलं आहे. इंडिया हे नाव आत्ता यूपीएनं घेतलंय. पण ही लढाई अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या अनेक वर्षांपासून लढत आहे – पंकजा मुंडे

11:28 (IST) 6 Sep 2023
Maharashtra Breaking News: “आता अचानक असं काय झालं?” जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारला सवाल

“…ही नावं दिली तेव्हा छान छान वाटलं, आता अचानक असं काय झालं? ये डर अच्छा लगा”

11:26 (IST) 6 Sep 2023
अमरावती विद्यापीठातील तीन संशोधकांना स्‍टॅनफोर्ड विद्यापीठाच्‍या प्रभावशाली शास्‍त्रज्ञांच्या यादीत स्‍थान

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगातील २ टक्‍के प्रभावशाली शास्त्रज्ञांमध्ये भारतातील ३ हजारावर शास्‍त्रज्ञांना स्थान दिले असून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्‍या तीन शास्त्रज्ञांचाही या यादीत समावेश आहे.

सविस्तर वाचा…

महाराष्ट्र न्यूज

Maharashtra Live News Today: जाणून घ्या राजकीय, सामाजिक व गुन्हेगारी जगतातील महत्त्वाच्या बातम्या