Maharashtra Breaking News Live Updates, 15 October 2025: दिवाळी संपल्यानंतर महाराष्ट्रात महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आघाडी-युतीच्या चर्चा जोर धरू लागलेल्या असतानाच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारणही सुरू झालं आहे. त्यातच महाविकास आघाडी अधिक मनसे अशी विरोधकांची निवडणूक आयोगाविरोधात एकजूट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आघाडी वा युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचं सर्वच पक्षांनी जाहीर केल्यामुळे कुठे कुणाची युती तर कोण विरोधात याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
Maharashtra Marathi News Live Updates: महाराष्ट्रातील सर्व राजकीय घडामोडींचा आढावा...
‘डाॅक्टर’ असला म्हणून सगळे कळते असे नाही, डोंबिवलीत अनधिकृत फेरीवाल्यांवरून राजु पाटील यांचा संताप
क्रॉफर्ड मार्केटमध्ये मध्यरात्री अग्नितांडव
BJP Mocks Uddhav Thackeray Meeting Election Commission: निवडणूक आयोग भेटीवरून भाजपाचा विरोधकांना टोला!
आपण नेमकं कशासाठी जातोय…
त्यासाठी नेमकं कुणाकडे जायला हवं, याचं साधं आकलन नाही…
विषय समजून घेण्याची कुवत नाही…
कोणता विषय कोणाकडे न्यावा याचे भान नाही…
कायदेशीर बाबींचे ज्ञान नाही…
‘झगामगा मला बघा’ यापलीकडे पोच नाही …
आणि म्हणूनच जनतेचा विश्वास नाही…
बहुसदस्यीय प्रभाग रद्द करा, मतपत्रिकेवर मतदान घ्या आणि मतदारयाद्यांमध्ये बदल करा, अशा राज्य निवडणूक आयोगाला, निवडणूक अधिकाऱ्यांना अधिकारच नसलेल्या मागण्या करून शरद पवार, उध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात, राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे गोंधळ घातला त्याचे वर्णन नेमके याच शब्दात करावे लागते!!
राज ठाकरे यांचं ठीक आहे. उद्धव ठाकरेंना तर प्रशासन कशाशी खातात तेही माहीत नाही, पण शरद पवार, बाळासाहेब थोरांतासारखे ज्येष्ठ व प्रशासनाची माहिती असलेली अनुभवी नेतेमंडळी अशा शिष्टमंडळात फरफटत जातात, ही राजकीय अपरिहार्यता की अपयशामुळे येणारी अगतिकता?…
https://twitter.com/keshavupadhye/status/1978289374103302433
इंग्रजांच्या सवलती मोदी सरकारने काढल्या, दिवाळी अंक अडचणीत!
नेस्कोच्या जमीन अधिग्रहणाप्रकरणी सरकारचा तडाखा…निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द
६० कोटींच्या फसवणुकीचे प्रकरण : तर पतीच्या विरोधात माफीचा साक्षीदार का होत नाही? अभिनेत्री शिल्पा शेट्टीला उच्च न्यायालयाची विचारणा
मोक्कांतर्गंत दाखल गुन्हा रद्द करा…कुख्यात फरारी गुंड निलेश घायवळची उच्च न्यायालयात धाव
राष्ट्रवादीत दिवाळीपूर्वीच फटाके, मामा-भाच्याचा ताबा व सहकार हद्दपार ? पण खासदार म्हणतात…
सायबर गुन्ह्यात आयटी अभियंत्यांची सर्वाधिक फसवणूक; वाचा काय आहेत फसवणुकीची कारणे?
नोकरीचे आश्वासन देऊनही ५ लाख प्रशिक्षणार्थी बेरोजगार; शरद पवार गटाने घेतली 'ही' भूमिका…वाचा
खासदार-आमदारांविरुद्धचे खटले प्रलंबित असणे असमाधानकारक, जलदगतीने निकाली काढण्यासाठी दैनंदिन सुनावणी घ्या...
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचे वाटप करा; मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
उद्वाहन अपघात रोखण्याच्या मागणीसाठी जनहित याचिका; राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
Swargate Katraj Metro News: स्वारगेट-कात्रज मेट्रोचे काम ‘अदानी’कडे
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) ५.४६ किलोमीटर अंतराच्या स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मार्गिकेचे काम अदानी समूहाच्या ‘आयटीडी सिमेंटेशन इंडिया लिमिटेड’ या कंपनीला मिळाले आहे. या कंपनीची १,६४३.८८ कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
३०० कोटींचा बॉलीवूड थीम पार्क प्रकल्प रद्द, स्थानिकांच्या विरोधानंतर निर्णय
ओसीविरहीत इमारतींना अभय, मुंबईतील इमारतींसाठी योजना; अधिमूल्यात सवलत, दंडही माफ
आपण नेमकं कशासाठी जातोय…
त्यासाठी नेमकं कुणाकडे जायला हवं, याचं साधं आकलन नाही…
विषय समजून घेण्याची कुवत नाही…
कोणता विषय कोणाकडे न्यावा याचे भान नाही…
कायदेशीर बाबींचे ज्ञान नाही…
‘झगामगा मला बघा’ यापलीकडे पोच नाही …
आणि म्हणूनच जनतेचा विश्वास नाही…
बहुसदस्यीय प्रभाग रद्द करा, मतपत्रिकेवर मतदान घ्या आणि मतदारयाद्यांमध्ये बदल करा, अशा राज्य निवडणूक आयोगाला, निवडणूक अधिकाऱ्यांना अधिकारच नसलेल्या मागण्या करून शरद पवार, उध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात, राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे गोंधळ घातला त्याचे वर्णन नेमके याच शब्दात करावे लागते!!
राज ठाकरे यांचं ठीक आहे. उद्धव ठाकरेंना तर प्रशासन कशाशी खातात तेही माहीत नाही, पण शरद पवार, बाळासाहेब थोरांतासारखे ज्येष्ठ व प्रशासनाची माहिती असलेली अनुभवी नेतेमंडळी अशा शिष्टमंडळात फरफटत जातात, ही राजकीय अपरिहार्यता की अपयशामुळे येणारी अगतिकता?
https://twitter.com/keshavupadhye/status/1978289374103302433
Ladki Bahin Yojana: ई - केवायसीसाठी लाडक्या बहिणींचे '' जागरण ''
ठाण्यातील विकास प्रकल्पांवर मात करण्यासाठी जलबोगदा
कल्याण डोंबिवली पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त २० हजाराचे सानुग्रह अनुदान
पुण्यातील साथ ‘कोलिफार्म’मुळे! महापालिकेच्या तपासणीत धक्कादायक निष्कर्ष
Mahavikas Aghadi MNS Delegation : विरोधकांच्या निवडणूक आयोगाकडे मागण्या - ६
प्रभाग पद्धतीने जिथे निवडणुका होणार आहेत, तिथे व्हीव्हीपॅट पद्धत वापरता येणार नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे, अरे मग प्रभाग पद्धतच रद्द करा की! खर तर प्रभाग पद्धत मुळात आणलीच कशासाठी? त्यांचा मतदारांना काय उपयोग? मतदारांनी तरी चार चार वेळा मतदान का करायचं? निवडणुकांनंतर कामासाठी त्यांनी कोणत्या नगरसेवकाकडे जायचं? तेच नगरसेवक आपापसात क्रेडिटसाठी आणि (इतर) गोष्टींसाठी भांडत बसतात. मग प्रभागातील कोण बघणार? ही अशी निवडणूक पद्धत तर संपूर्ण भारतात कुठेच नाहीये मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे? सत्ताधायींच्या सोयीसाठी का?
Mahavikas Aghadi MNS Delegation : विरोधकांच्या निवडणूक आयोगाकडे मागण्या - ५
महापालिका निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट वापरलं जाणार नाही असं निवडणूक आयोगाने सांगितलं, असं का? निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की, व्हीव्हीपॅटसोबत जोडण्याकरिता आवश्यक असलेल्या ईव्हीएम त्यांच्याकडे पुरेशा नाहीत? मुळात २०२२ मध्ये होणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता २०२६ मध्ये होणार आहेत. मग चार वर्षात निवडणूक आयोग तयारी तरी कसली करत होते? आजपर्यंत हजारो करोड रुपये खर्च करून जी व्हीव्हीपॅट मागवली गेली ती नक्की कुठे आहे? सामान्य जनतेचा ईव्हीएमवरच विश्वास नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी खातरजमा करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ‘व्हीव्हीपॅट. तोच मार्ग तुम्ही बंद करणार असाल तर निवडणूक आयोगाच्या कारभारावर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा?
Mahavikas Aghadi MNS Delegation : विरोधकांच्या निवडणूक आयोगाकडे मागण्या - ४
महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर परराज्यातून कामासाठी येणाऱ्यांचा भरणा आहे. यातील अनेक मतदार त्यांच्या मूळच्या राज्यातदेखील मतदार असतात आणि इथे पुन्हा महाराष्ट्रात पण मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करून घेतात. मुळात दोन दोन ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी करणे, मतदान करणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण मुळात दुबार नोंदणी होऊ नये, ही जबाबदारी निश्चितच आहे निवडणूक आयोगाची आहे. पण अशी दुबार नोंदणी काढण्यासाठी तेथील निवडणूक आयोग नक्की काय प्रयत्न करत आहे? जर बिहारमध्ये दुबार नाव नोंदणी काढण्यासाठी तेथील निवडणूक आयोगाने विशेष मोहीम राबवली तर मग महाराष्ट्रात तसा प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी का दिसत नाही आहे? दुबार नोंदणी काढण्यासाठी ‘डी-डुप्लिकेशन’ पद्धतीचा वापर करावा.
Mahavikas Aghadi MNS Delegation : विरोधकांच्या निवडणूक आयोगाकडे मागण्या - ३
निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ च्या मतदार यादीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असं घोषित केलं. म्हणजे जुलै २०२५ नंतर ज्यांचं वय १८ पूर्ण होईल त्यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुढे ५ वर्षे थांबायचं? निवडणुकीची घोषणा होईपर्यंत जो जो मतदार १८ वर्षांचा होईल त्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळायलाच हवा.
Mahavikas Aghadi MNS Delegation : विरोधकांच्या निवडणूक आयोगाकडे मागण्या - २
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका २०२४ ला झाल्या आणि त्यादरम्यानची मतदार यादी ३० ऑक्टोबर २०२४ ला प्रसिद्ध झाली. मात्र त्यानंतर ऑक्टोबर २०२४ ते जुलै २०२५ च्या दरम्यान यादीत जी नावं समाविष्ट झाली, ती नावं व नवीन यादी अजूनही प्रसिद्ध का झाली नाही? मतदार यादीवर अभ्यास करणे हा प्रत्येक राजकीय पक्षाचा हक्क आहे, पण राजकीय पक्षांनाच किंवा आम्ही तर म्हणतो अगदी सामान्य माणसालासुद्धा मतदार यादी का बघायला मिळत नाही आहे. ही यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू आहेत की, कोणाचा तरी दबाव आहे? असं काही असल्यास निवडणूक आयोगाने तसं स्पष्ट सांगावं आणि जर यादी प्रसिद्ध करायचीच नसेल तर निवडणुकीचा फार्स कशाला करायचा?
Mahavikas Aghadi MNS Delegation : विरोधकांच्या निवडणूक आयोगाकडे मागण्या - १
२०२४ मध्ये लोकसभेच्या आणि महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर नवीन मतदार नोंदणी झाली आणि नावं वगळलीदेखील गेली… पण जी नावं वगळली त्याची यादी किंवा त्याचा तपशील राजकीय पक्षांना किंवा मतदाराला बघायला का मिळत नाही? एखाद्या व्यक्तीचं नाव का वगळलं गेलं याची कारणं त्याला किंवा राजकीय व्यवस्थेला कळायला नको का? त्यामुळे निवडणूक आयोगाने जी नावं वगळली आहेत, त्याचा पूर्ण तपशील आणि ती नावे ही त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलीच पाहिजेत. कारण तो प्रत्येक मतदाराचा अधिकार आहे.
"ती यादी लपवण्यात छुपा राजकीय हेतू?" मविआ व मनसेचे निवडणूक आयोगाला सहा प्रश्न, निवेदनात काय म्हटलंय?
Maharashtra Marathi News Live Updates: मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्या एका क्लिकवर