Maharashtra Breaking News Today, 16 November 2023 : मालेगाव येथील रेणुकादेवी सहकारी सूतगिरीणी उभारणीसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्ज रकमेत घोटाळा केल्याप्रकरणी शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेते अद्वय हिरे यांना बुधवारी ( १५ नोव्हेंबर ) अटक करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. दुसरीकडे, मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या महाराष्ट्रात दौरा सुरू आहे. यासह विविध महत्वाच्या बातम्या जाणून घेणार आहोत…
Latest Latest Maharashtra News Updates : राजकीय, क्राइम आणि विविध बातम्या फक्त क्लिकवर....
"एक ओबीसी नेते छगन भुजबळांना पाडलं, तर १६० मराठा आमदारांना पाडल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
नाशिक: किमान सेवानिवृत्ती वेतन नऊ हजार रुपये असावे, इपीएफ निवृत्तीवेतन प्रश्नावर श्वेतपत्रिका जाहीर करावी, यासह इतर मागण्यांसाठी गुरूवारी नाशिक जिल्हा इपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
नाशिक: फटाके फोडण्यावरून मागील भांडणाची कुरापत काढत दिवाळी पाडव्याच्या रात्री पाथर्डीजवळील स्वराज्य नगरात युवकाची कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली. मारेकरी मयत युवकाचे मित्रच आहेत.
नाशिक: दिवाळीच्या सुट्टीनिमित्त अनेकांची पाऊले पर्यटनासाठी बाहेर पडली असून नाशिककर भटकंतीसाठी कोकण, केरळला पसंती देत असताना धार्मिक पर्यटनाच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागातून पर्यटक नाशिकमध्ये येत असल्याने पर्यटकांमुळे नाशिक, त्र्यंबकेश्वर गर्दीने ओसंडून वाहत आहे.
नागपूर : दुष्काळी परिस्थितीत सरकारकडून कर्ज मिळवून देण्याच्या नावावर जिल्ह्यातील १५१ शेतकऱ्यांची ११३ कोटींनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी १८ पेक्षा जास्त जणांविरुद्ध मौदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक: दिंडोरीकडून पिंपळनारे येथे मोटारसायकलने जात असताना पाठीमागून एका वाहनाची धडक बसल्याने अक्राळे फाट्याजवळ दोन युवकांचा मृत्यू झाला. कळवण रस्त्यावर हा अपघात झाला. बुधवारी रात्री साडेआठ वाजता दिंडोरीकडून पिंपळनारे येथे तुषार खांदवे (२०) आणि राहुल खांदवे (३०, रा. पिंपळनारे) हे दोघे जण मोटारसायकलने जात होते. नाशिक- कळवण रस्त्यावरील अक्राळे फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला मागून दुसऱ्या वाहनाची धडक बसली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. दिंडोरी पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली आहे.
पुणे: भरधाव वेगात दुचाकीवरून निघालेल्या तरुणाचा पुलाच्या मध्यभागी असणाऱ्या कठड्याजवळील सिमेंटच्या ब्लॉकला धडकून जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (१५ नोव्हेंबर) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास वडगाव पुलावर घडली.
नाशिक: मुंबईस्थित कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या एकाला अर्धवेळ काम शोधणे चांगलेच महागात पडले. संशयितांनी भूलथापा देऊन संबंधिताला तब्बल ११ लाखाला गंडा घातला.
नाशिक: दिवाळीच्या दिवशी पेटत्या दिव्यावर साडीचा पदर पडल्याने भाजलेल्या ४२ वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला. चेहडी येथील बनकर मळा भागात ही घटना घडली. स्नेहल पारधी (बनकरमळा, चेहडी, नाशिकरोड) असे महिलेचे नाव आहे. पारधी या दिवाळीत घर परिसरात दिवे लावत होत्या. यावेळी पाठीमागील पेटत्या दिव्यावर साडीचा पदर पडल्याने त्या गंभीर भाजल्या होत्या. सुमारे ७० टक्के भाजल्याने कुटूंबियांनी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
पुणे: भाऊबीजेनिमित्त बहिणीला भेटायला निघालेल्या भावाचा त्याच्या दुचाकीला भरधाव डंपरने धडक दिल्याने घडलेल्या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (१५ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी आंबेगाव पठार येथे घडली.
नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सना ऊर्फ हिना खान यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. परंतु, साडेतीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही अद्यापपर्यंत सना यांचा मृतदेह गवसलेला नाही. मृतदेह मिळाला नसला तरी आरोपी विरुद्ध भक्कम असे तांत्रिक पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पुणे: दारु पिताना झालेल्या वादातून गच्चीत थांबलेल्या मित्राला धक्का दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील वडगाव शेरी भागात घडली. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकास अटक केली.
गडचिरोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त पिपली बुर्गी येथे भेट देऊन स्थानिक आदिवासी व पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांच्या या दौऱ्यानंतर रात्री भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे नक्षलवाद्यांनी पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
"मी हे सांगू इच्छितो, त्यांच्या मतदारसंघात ( अमळनेर ) मी जाऊन आलो. पुढच्या विधानसभेला ते निवडून आलेले दिसणार नाहीत. त्याची आम्ही काळजी घेऊ," असा सूचक इशारा शरद पवारांनी अनिल पाटलांना दिला आहे.
वसई- नव्याने तयार झालेल्या नायगाव पोलीस ठाण्याला जागेची कमतरता भेडसावू लागली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या पोलीस ठाण्यासमोर असलेल्या मोकळ्या जागेत तीन कंटेनर उभारून त्यात पोलीस अधिकार्यांसाठी अतिरिक्त कक्ष तयार केले जात आहे. असा प्रकारे कंटेनर मध्ये पोलीस ठाणे तयार करणारे नायगाव हे पहिले पोलीस ठाणे ठरणार आहे.
मालेगाव येथील रेणुकादेवी सहकारी सूतगिरणी उभारणीसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्ज रकमेत घोटाळा केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना पोलिसांनी अटक केली होती. आता न्यायालयानं अद्वर हिरेंना २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
"मराठी पाट्यांच्या विरोधात व्यापारी न्यायालयात जातात. महाराष्ट्र ज्याला पोसतोय, असं बाहेरील राज्यातील व्यापारी न्यायालयात जातात. पण, सर्वोच्च न्यायालयाने मराठी पाट्या झाल्या पाहिजेत, असं आदेश दिला. मात्र, सरकारकडून कुठलेही प्रयत्न केले जात नाहीत. आम्हालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे," असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.
डोंबिवली: डोंबिवली जवळील ठाकुर्ली-चोळे गावात मंगळवारी दिवाळी सण पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला. मंगळवारी बलिप्रतिपदा असल्याने ग्रामस्थांनी आपल्या घरातील गोधनाला सजवटून, रंगरंगोटी केली होती.
अमरावती : चांदूर रेल्वे मार्गावर एसआरपीएफ कॅम्प नजीक एक बिबट मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. अज्ञात वाहनाच्या धडकेने या बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
"शिवसेनेच्या वतीनं निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. केवळ भाजपा सत्तेवर असल्यामुळे त्यांना फ्री हिट द्यायची आणि आमची विकेट काढायची. याला मोकळ्या वातावरणातील निवडणुका म्हणता येत नाही," अशी टीका शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
नाशिक: शहरासह पिंपरी चिंचवड, भोसरी भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन संशयित चोरांकडून पोलिसांनी साडेपाच लाखहून अधिक किंमतीच्या आठ मोटारसायकली हस्तगत केल्या. या कारवाईतून मोटारसायकल चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आले.
"राज्यात सुरू असलेलं राजकारण पहिल्यांदा बघतोय", शरद पवारांची प्रतिक्रिया
मुंबई: प्रत्येक राज्यामध्ये १० लाख लोकसंख्येमागे १०० एमबीबीएस डॉक्टर हे गुणोत्तर राखण्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्याचा, तसेच वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूर : फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून भारतात आलेल्या व नंतर नागपूरमध्ये स्थलांतरित झालेल्या ४०० निर्वासितांचे जमिनीचे पट्टेवाटप प्रलंबित असून याबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे.
पुणे: कौटुंबिक वादातून ओैषधी गोळीतून महिलेला ब्लेड देऊन तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली.
ठाणे: जिल्ह्यातील नाट्यगृहांमध्ये दिवाळी सुट्टीनिमित्त बालनाट्यांचा महोत्सव भरल्याचे दिसून येत आहे. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन, डॅा. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह आणि कल्याणमधील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात १६ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत विविध बालनाट्य मुलांच्या भेटीसाठी आले आहेत.
गोंदिया : जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. यादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी सीमावर्ती भागात कडक पोलिस बदोबस्त लावला आहे. सीमावर्ती भागात तपासणी नाके तयार करण्यात आले आहे. या नाक्यावर दुचाकींसह, तिनचाकीह, चारचाकी वाहने व इतर वाहनांची तपासणी केली जात आहे.
अद्वय हिरेंच्या अटकेवरून खासदार संजय राऊतांनी शिंदे सरकार आणि मंत्री दादा भुसे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "अद्वय हिरे यांची अटक राजकीय दबावतंत्रातून झाली आहे. पराभवाच्या भीतीनं मंत्री महोदयांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून अद्वय हिरे आणि कुटुंबीयांविरोधात ४० च्याआसपास गुन्हे दाखल केले आहेत," असा आरोप संजय राऊतांनी दादा भुसेंवर केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
"संजय राऊतांना राजकीय मलेरिया झाला आहे. अजित पवार घरी बसले, तरी राजकीय डेंग्यू झालाय म्हणतात. कुटुंबाच्या कार्यक्रमाला गेले, तरी संजय राऊतांना त्रास आहे. अजित पवार अमित शाहांना भेटले, तरी त्रास होतो. संजय राऊतांना रूग्णालयात दाखवण्याची गरज आहे," अशी टीका मंत्री अनिल पाटील यांनी केली आहे.
वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार व अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे प्रमुख नेते मकरंद पाटील यांनी आज बुधवारी सायंकाळी उशिरा बारामती येथे गोविंद बागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचे सांगण्यात येत असले तरी या दोघांमध्ये सुमारे पाऊण तास विविध विषयांवर चर्चा झाली.