Maharashtra Live News Updates, 28 October 2025 : “महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला आता कोणत्याही कुबड्यांची गरज उरलेली नसून आमचा पक्ष स्वबळावर मजबूत आहे आणि आमचा पक्ष राज्यात ताकदीने उभा आहे”, असं परखड मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (२७ ऑक्टोबर) व्यक्त केलं. यावरून आता विरोधकांनी म्हटलं आहे की “भाजपाला आता कुबड्यांची म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गरज राहिलेली नाही.” शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “अजित पवार व एकनाथ शिंदेंमध्ये थोडा जरी स्वाभिमान असेल तर त्यांनी आता सरकारमधून बाहेर पडायला हवं.”
दुसऱ्या बाजूला, “कुबड्या म्हणजे मित्र नव्हे”, असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे. अमित शाह यांच्या या वक्तव्यावरून राज्यात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे. या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
भाजपाचा आता बारामतीकडे मोर्चा : रोहित पवार
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या चौकशीच्या आदेशांवर राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे की भाजपाने आता बारामतीकडे मोर्चा वळवला आहे. कदाचित हा त्यांचा कुबड्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न आहे.
जैन बोर्डिंगच्या जमिनीचं प्रकरण : “गोखले बिल्डर्सचे २३० कोटी रुपये गोठवावे”, धंगेकरांची मागणी
दरम्यान, पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या व्यवहाराचं प्रकरण अजूनही चर्चेत आहे. याप्रकरणी गोखले बिल्डरने व्यवहार रद्द केला असला तरी सदर विषय लावून धरणारे शिवसेनेचे (शिंदे) नेते रवींद्र धंगेकर यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला आहे. ते म्हणाले, “सदर व्यवहारात गोखले बिल्डरने केलेल्या करारात म्हटलं आहे की कोणीही माघार घेतल्यास संबंधित रक्कम परत देता येणार नाही. त्यामुळे त्यांनी दिलेली २३० कोटी रुपये ही रक्कम गोठवली जावी. तसेच या जमिनीचा व्यवहार करणाऱ्या बोर्डिंगच्या विश्वस्त मंडळातील सदस्यांना बरखास्त करावं.”
तसेच या प्रकरणी धंगेकर आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची भेट घेणार आहेत. या विषयीच्या सर्व घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. तसे राज्यातील इतर राजकीय व सामाजिक बातम्यांवर आपलं लक्ष असेल.
Maharashtra Weather Today Live Updates : राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
सकाळी मोटारीसह अपहरण, रात्री सुटका....शहाद्यातील सराफी व्यावसायिकाला मारहाण
हंगामापूर्वी साखरपट्ट्यातील वातावरण तापले
Mumbai BMC Hospitals Staff Shortage : मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील ४५ टक्के जागा रिक्त
अनिलकुमार पवार यांच्या सुटकेला ईडीचे आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस...
Gold-Silver Price : सोने, चांदीचे दर धड्डाम कोसळले... जळगावमध्ये आता ‘इतके’ स्वस्त !
गुरूजींची नोंदणी आता 'ऑनलाईन'; मतदार नोंदणी प्रक्रियेला….
Heena Gavit : माजी खासदार डाॅ. हिना गावित यांचा 'या' पक्षात प्रवेश
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार अखेर रद्द होत आहे. या व्यवहाराविरोधात लढणारे शिवसेनेचे (शिंदे) नेते व माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. काही कथित पुरावे देखील सादर केले होते. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांच्या कारभारावर शंका उपस्थित केली गेली. मात्र, अचानक धंगेकर यांनी मोहोळ यांचा उल्लेख करणं टाळलं. त्यामुळे धंगेकर यांच्यावर कोणाचा दबाव आहे का असा प्रश्न उपस्थित केला गेला. मात्र, आता धंगेकर यांनी स्पष्ट केलं की त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मित्रपक्षांवर टीका न करण्यास सांगितलं होतं. मात्र, पुणेकरांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत राहा अशा सूचनाही केल्या.
रवींद्र धंगेकर म्हणाले, "पुणेकरांची भूमिका हीच माझी भूमिका आहे. मी जो काही लढा देत आहे. त्या लढ्याला आमच्या पक्षाच्या प्रमुखांनी कायम सहकार्य केलं आहे. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. मी पक्षप्रवेश केल्यापासून आमचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या पाठिशी आहेत. मी खरं बोलतो म्हणून ते मला पाठिंबा देतात. त्यांनी मला सांगितलं की तू मित्रपक्षांवर काही बोलायचं नाही. परंतु, पुण्यातील गुन्हेगारीविरोधात, पुणेकरांच्या प्रश्नांसाठी लढत राहा."
VIDEO : ‘मी जिवंत आहे; माझ्या निधनाची बातमी…’ माजी मंत्री वसुधाताई देशमुख यांचा खुलासा!
पुण्यातील जैन बोर्डिंग होस्टेलच्या जागेत १८ मजले इमारत उभारण्याची मान्यता, कोणी केला आरोप ?
बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम, तर ट्रॅक्टर मोर्चा रामगिरीवर धडकेल!
नाशिकच्या कुंभ मेळाव्यात पाचशे भाविकही स्नान करणे अशक्य, कुंभमेळा होणार कसा? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले…
विद्यार्थी आधार कार्ड अपडेटचा गोंधळ; शाळेत असूनही १० लाख विद्यार्थी 'शाळाबाह्य' ठरण्याचा धोका, अध्यापक भारतीने केली 'ही' मागणी....
नगरमध्ये सकल जैन समाजाचा निषेध मोर्चा ; पुण्यातील जमीन विक्री प्रकरणात दोषींवर कारवाईची मागणी
गोगावलेंचा युतीचा प्रस्ताव तटकरेनी धुडकावला
माता- पिता दोघेही नशेत, अन मुलांची भुकेने होरपळ
वाघ-मानव संघर्षावर मुख्यमंत्र्यांच्या काकूने सुचविला उपाय
नाशिकचे मंत्री काय कामाचे? गिरीश महाजन मदतीचे...आमदार हिरामण खोसकर यांचा दावा
नागपूर विमानतळावर सापडले सुपर स्लिम सिगारेट्सचे घबाड
World Stroke Day 2025 : मेंदूविकाराचा झटका वेळेत ओळखलात तरच वाचाल! भारतात दरवर्षी १८ लाख रुग्णांची नोंद, पाचपैकी एकाचा मृत्यू...
‘स्थानिक’च्या निवडणुका स्वबळावर; काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सूर
संगमनेरमध्ये मतदार यादींवर हरकतींचा पाऊस
“…तर शिंदे-पवारांनी स्वाभिमानाने सरकारमधून बाहेर पडावं”, ठाकरे गटाचा सल्ला
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, "अमित शाह म्हणालेत की त्यांना आता कुबड्या नको. याचा अर्थ त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की त्यांना महाराष्ट्रात आता कोणाचीच गरज नाही. त्यामुळे या अपमानानंतर आता एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी सरकारमधून बाहेर पडावं."
"अमित शाहांच्या वक्तव्यातून स्वाभिमानाची ठिणगी पेटत असेल तर ती पेटली पाहिजे. काल अमित शाह यांनी कुबड्या असा उल्लेख करत गरज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिंदे व पवार या दोघांमध्ये थोडा जरी स्वाभिमान असेल तर त्यांनी आता मराठा स्वाभिमान दाखवावा आणि राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडावं."
