Manoj Jarange 1 month ultimatum to CM Devendra Fadnavis Govt : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळाल्यानंतर काल (५ डिसेंबर) भाजापाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्याबरोबरीने शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनीदेखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दरम्यान हा शपथविधी झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या ५ जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करत आहेत. यादरम्यान त्यांनी अनेकदा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीकादेखील केली आहे. मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री बनले आहेत. त्यामुळे मनोज जारांगे यांच्या आगामी काळातील आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा सामना पाहायला मिळू शकतो.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

राज्यात स्थापन झालेल्या महायुती सरकारबद्दल बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “सरकार स्थापन झालं आहे, आता जनतेचे प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. जी समाजातील खदखद त्यांना दिसत नसेल, पण ती इतकी भयंकर सुप्त लाट आहे की ते त्रासून जातील. काल ५ तारखेला त्यांचं सरकार स्थापन झालं आहे. त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत. तिघांचेही मनापासून अभिनंदन”.

हेही वाचा>> Cash Recovered From Congress MP Seat : राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या जागेवर सापडले नोटांचे बंडल; सभापतींचे चौकशीचे आदेश

“पुढच्या काळात गोरगरीबांचे प्रश्न मार्गी काढावे. कारण ५ तारखेला त्यांचा शपथविधी झाला, आता येत्या ५ तारखेपर्यंत म्हणजेच ५ जानेवारीपर्यंत या एक महिन्यात त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढावा, अन्यथा मराठे पुन्हा तुफान ताकदीने आंदोलनासठी उभे राहून सरकारला परेशान करणार, सोडणार नाही.

“८३ क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे, २००४ चा अध्यादेशात दुरूस्ती करावी, सगेसोयरेची अंमलबजावीणी करावी, हैदराबादसह सातारा संस्थान आणि बॉम्बे सरकारचे गॅझेट, या तीनही गॅझेट संबंधीच्या मागण्या, लाखो पोरांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेणे अशा आपल्या आठ ते नऊ मागण्या याच सरकारकडे केलेल्या आहेत त्या त्यांनी मार्गी काढाव्या, अन्यथा त्यांना पुन्हा मराठ्यांना सामोरे जावे लागेल”, असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.

Story img Loader