लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्यानंतर काही महिन्यांनी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. असे असताना बीड लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये जातीचं राजकारण झाल्याचा आरोप होत आहे. तसेच दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचाही आरोप होतो आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच येणाऱ्या काळात सत्तेत जाण्यासंदर्भात त्यांनी मोठं विधान केलं आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासंदर्भात याआधी अनेकदा सूचक विधानं केली आहेत.

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

“बीड जिल्हा संतांची भूमी आहे. आमच्या महाराष्ट्रात आणि बीड जिल्ह्यात असं कधी झालं नाही. आम्ही कधीच म्हणणार नाही की एखाद्या समाजाच्या दुकानात जाऊ नका. असे विचार आम्ही ठेवणार नाहीत. जातीय तेढ निर्माण व्हायला काय झालं? १३ तारखेपर्यंत मतदान होईपर्यंत मराठे चांगले होते. १३ तारीख संपली की मराठे वाईट झाले. निवडणुकीत मराठ्यांनी तुमचं काम केलं नाही का? मराठ्यांनो मी तुम्हाला हात जोडून सांगतो, शांत राहा. आपण फक्त पाहायचं कोण काय करतंय. एक महिनाभर चुका करूद्या, आपण शांत राहा”, असं मनोज जरांगे म्हणाले. मात्र, त्यांच्या या विधानाचा रोख कुणाकडे होता? याबाबत आता तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Nitin Gadkari Kundali Predictions
मोदींच्या पंच्याहत्तरीच्या चर्चेत ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; २०२६ नंतर गडकरींच्या कुंडलीत राजकीय बहुमानाचा योग

हेही वाचा : “…म्हणून २००४ मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही”, सुधाकरराव नाईकांचा उल्लेख करत अजितदादांनी सांगितली पवारांची भीती

ते पुढे म्हणाले, “आमचं आंदोलन मोडण्याची कोणाचीही टप्पर नाही. आंदोलन हा संविधानाने दिलेला एक हक्क आहे. काहीजण राजकीय हितापोटी जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार असून आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहोत. आम्ही शांत आहोत, आम्हाला शांत राहूद्या. जातीय तेढ निर्माण होऊ नये, असं आवाहन बीड जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांना करतो. त्यांच काम होईपर्यंत ते सगळ्यांच्या पाया पडले. मात्र, शेवटी एक पर्याय आहे. अन्याय बंद करायचा असेल आपल्याला सत्तेत जावं लागणार आहे”, असं मोठं विधान मनोज जरांगे यांनी केलं.

४ जूनच्या उपोषणावर ठाम आहात का?

“ज्यांनी मराठा समाजावर अन्याय केला, त्यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही, पण नाव घेऊन त्यांना पाडल्याशिवाय सोडायचं नाही”, असं म्हणत ४ जूनच्या उपोषणावर आपण शंभर टक्के ठाम आहोत. माझ्या समाजाच्या न्यायाचा विषय असून राज्य सरकारने आम्हाला दिलेल्या शब्दाला आज पाच महिने होऊन गेले आहेत. मग राज्य सरकारला अजून किती दिवस पाहिजेत?”,असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.