लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सांगलीतून शहीद अशोक कामटे स्मुर्ति फाऊंडेशनच्या वतीने ४७० किलोमीटर दौडींने रविवारी शहीदांना अभिवादन करण्यात आले.

सांगलीतील शहीद कामटे चौकातून मशाल व तिरंगा ध्वज घेवून सोमवार २० नोव्हेंबरला दौडीचा प्रारंभ झाला. तासगाव, विटा, पुसेसावळी, सातारा, पुणे, मारुंजी, खोपोली, पनवेल, माटुंगा या मार्गे ही दौड आज सकाळी गेट वे ऑफ इंडिया येथे पोहचली.

आणखी वाचा-“…कुणबी प्रमाणपत्रांना तत्काळ स्थगिती द्या”, मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ आक्रमक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपर पोलीस महासंचालक ( वाहतूक) रविंद्र सिंगल यांनी धावपटुंसोबत शहीद तुकराम ओंबळे स्मारक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत सहभाग घेतला. दौडीतील धावपटूंचे स्वागत व कौतुक प्रमाणपत्र आणि मानचिन्ह गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देवून गौरव करण्यात आला. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री उपनगर मुंबई मंगल प्रभात लोढा, विशेष पोलीस महानरीक्षक यशस्वी यादव, डीसीपी डॉ .प्रवीण मुंडे, पोलीस बॉईज संघटना अध्यक्ष राहूल दुभाले, डेप्युटी कमिशनर कस्टम सोहेल काजी, ज्योतिरादित्य कोरे, कामटे फाउंडेशनचे अध्यक्ष समित दादा कदम व विश्वगंधा कदम आदी उपस्थित होते.