राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी मनसेनं आंदोलन पुकारलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत मंदिर किंवा मशिदीवर भोंगे वाजवले जाऊ नये, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या ३ मे च्या अल्टिमेटमनंतर राज्यभरात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर, अनेक ठिकाणी भोंगे बंद करण्यात आले. शिर्डीमध्येही मशिद आणि मंदिरांवरील भोंगे बंद करण्यात आले होते. त्यामुळे साई मंदिरातील पहाटेच्या काकड आरतीसाठी लाऊडस्पीकरवर वापरण्यात आले नाही. दरम्यान, आता मुस्लीम समुदायाने पुढाकार घेत साई मंदिरातील काकड आरतीसाठी लाऊडस्पीकर वापरण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. 

साई मंदिरावर भोंगे लावण्यात आले असून त्यातून दररोज काकड आरती आणि शेजाआरती होते. परंतु मनसेच्या आक्रामक भूमिकेनंतर मशिदीसह मंदिरांवरील भोंगे बंद करण्यात आले होते. त्यामुळे मुस्लीम समुदायाने पुढाकार घेत आम्ही पहाटेच्या अजानसाठी लाऊडस्पीकर वापरणार नाही, परंतु साई मंदिरावरील काकड आरती आणि शेजारती भोंग्यावरून करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष शमशुद्दीन इनामदार यांच्यासह मुस्लीम समुदायातील काही लोकांनी प्रशासनाला यासंदर्भात निवेदन दिलं आहे.

How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
DSSSB Recruitment 2024: Application begins for 650 Caretaker
सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, ‘या’ पदासाठी होणार भरती; जाणून घ्या संपूर्ण तपशील
Cyber Criminal, Small Amount Fraud, target, Cyber Police, Maharashtra, Unwilling to Register, small fraud cases,
सायबर फसवणुकीच्या हजारो तक्रारींची नोंदच नाही; कोट्यवधी रुपये गुन्हेगारांच्या घशात

आंदोलनानंतर राज्यात मनसे कार्यकर्त्यांची धरपकड

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न राज्यासह मुंबईतही करण्यात आला. राज्यात अनेक ठिकाणी मनसे सैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.  मनसेने घेतलेल्या पवित्र्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहरात कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी मुंबईतही पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड केली.